शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्ह्यातील वाचनालये गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे.

ठळक मुद्देअनेकांनी सुरु केला अभ्यास : नव्या सरकारकडून बेरोजगारांच्या आशा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत शासकीय नोकरभरतीच होत नसल्याने युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. असे असले तरी नव्या सरकारने महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आता नोकरभरती होतील, या आशेने जिल्ह्यातील बेरोजगारांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. त्यामुळे वाचनालये गर्दीने फुलले आहे.शिक्षण घेऊन सहजासहजी शासकीय नोकरी मिळत नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून पाहिजे तशी शासकीय नोकरभरतीच घेण्यात आली नसल्याने बेरोजगारांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे काहींनी अभ्यास करणे सोडून दिले. मात्र नवे सरकार स्थापन होताच बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे. पदभरती निघेल आणि आपल्याला शासकीय नोकरीत काम करण्याची संधी मिळेल, या आशेवर या युवकांची धडपड सुरु आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाचनालये आहे. ज्युबिली हायस्कूल परिसरात असलेले शासकीय वाचनालय, श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, बाबा आमटे अभ्यासिका या व्यतिरिक्त शहरात काही संस्था, संघटना वाचनालयेही सुरु केले आहे. या वाचनालयांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या गर्दी वाढली असून वाचनालये गर्दीने फुलले आहे.बेरोजगार युवकांना नव्या शासनाकडून आशा असून पदभरती निघाल्यास आपण मागे पडू नये, या आशेवर सदर बेरोजगार युवक पुन्हा त्याच जोमाने अभ्यासाकडे वळले आहे. मात्र त्यांची आशा नवे सरकार पूर्ण करते की, पुन्हा त्यांना केवळ अभ्यासच करावा लागतो. हे येणारा काळच सांगणार आहे.औद्योगिक जिल्ह्यात रोजगाराची वानवाचंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामच मिळत नसल्याची ओरड आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक खासगी उद्योग बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी काहींनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. मात्र पदभरती होत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा येत आहे.नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्यामागील काही वर्षांमध्ये शासकीय पदभरती पाहिजे तशी झालीच नसल्याने बेरोजगार युवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलने, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा फायदा झाला नाही. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नवे सरकार पदभरती करतील, अशी अपेक्षा सध्या बेरोजगार युवकांनी व्यक्त केली आहे.मागील सरकारच्या काळामध्ये अपवाद वगळता पदभरती झालीच नाही. जी झाली त्यामध्ये महापोर्टलचा सर्वत्र गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. नवेसरकार स्थापन झाल्यानंतर महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे सरकार नोकर भरतीसाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.-पुष्पकांत डोंगरे, चंद्रपूरमागील दोन ते तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहोत. मात्र पदभरतीच झाली नसल्याने अभ्यास सुरुच ठेवला आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सध्या विद्यार्थ्यांची वाचनालयांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.-प्रफुल्ल बोरकर, सावली

टॅग्स :Studentविद्यार्थी