शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ‘त्या’ देवदूतांशी कृतज्ञच राहूया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

चंद्रपूर : मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करून देणे हाच पर्याय आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे होता आणि ...

चंद्रपूर : मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करून देणे हाच पर्याय आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे होता आणि आजही आहे. आता कोविड बाधितांचा मृत्यूदर थोडा घसरणीला लागला. यासाठी अनेकांचे हातभार लागले. मात्र ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंगसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कामगाररूपी देवदूतांच्या कष्टाबाबत आपण सर्वांनीच सदैव कृतज्ञ राहावे, अशी भावना आदित्य एअर प्रॉडक्टचे संचालक इशान गोयल यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.

गतवर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती कशी होती, याविषयी इशान गोयल म्हणाले, मेडिकल ऑक्सिजनची इतकी डिमांड वाढेल असे वाटले नव्हते. जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उत्पादनही मर्यादित होते. कोरोनाचा कहर सुरू होताच रिफिलिंगची क्षमता वाढविणे व लगेच पुरवठा करणे या दोनही समस्यांवर मात करू शकलो. माणसांचे मृत्यू रोखणे हेच टार्गेट आम्ही पुढे ठेवले. त्यादृष्टीने कामगार व अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट उपसले. परिणामी, ऑक्सिजन उपलब्धतेत दोन्ही जिल्हे स्वयंपूर्ण होऊ शकले. यामध्ये रुक्मिणी मेटॅलिकचेही योगदान आहे. ऑक्सिजन सप्लॉई चेन उपलब्ध नसताना हे कसे शक्य झाले, या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे अडचणी दूर झाल्या आणि जिल्हा प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मेडिकल ऑक्सिजनची डिमांड घटली

चंद्रपूर जिल्ह्याची ऑक्सिजन रिफिलिंग क्षमता २,३०० मेट्रिक टन आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने आता मागणी घटू लागली. ऑक्सिजन सरप्लस होत आहे. उद्रेकाच्या कालावधीत दररोज ७ हजार लीटरचे ५० ते ६० सिलिंडर भरली जात होती.

३५ कामगार रात्रंदिवस परिश्रम घेत होते. आदित्य एअर प्रॉडक्टचे व्यवस्थापक हरीश गंधेवार यांच्या परिश्रमामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात ऑक्सिजन पुरवठा करणे सुलभ झाले. परिणामी डॉक्टरांनी हजारो कोविड रुग्णांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. हा कालावधी उद्योगासाठी आव्हानात्मक असल्याचे इशान गोयल यांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या लाटेसाठी एक युनिट सज्ज

कोरोना कधी संपेल, याबाबत सध्या काहीच सांगता येणार नाही. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आम्ही एक युनिट सज्ज करून ठेवला आहे. खरे तर हा युनिट १० वर्षांपासून बंद आहे. संभाव्य तिसरी लाट आलीच तर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही हा युनिट १०० टक्के अपडेट करून ठेवल्याची माहिती इशान गोयल यांनी दिली. जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या पीएसए प्लांटला मर्यादा असल्याचेही त्यांनी सांगितले.