लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : लॉकडाऊन सुरू झाल्याने पायी निघालेल्यांना तात्पूरत्या असऱ्यात ठेवून क्वारंटाईन करण्यात आले. क्वांरटाईनचा १४ दिवसांचा कालावधी सापल्याने त्यांना कुटुंबियांकडे जाण्याची ओढ लागली. घराकडे जाऊ द्या, नाही तर अन्न त्याग करू असे म्हणत वरोरा येथील तात्पूरत्या आसऱ्यातील सात व्यक्तींनी सकाळचा नास्ता व भोजन घेतले नाही. त्यामुळे प्रशासन समोर नवीन पेच उभा राहीला असल्याचे दिसून येत आहे.संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू झाल्याची कल्पना मध्यप्रदेशातील सिरोली जिल्हा येथील खमरीया या गावातील सात मजुरांना आली नाही. ते सातही व्यक्ती नेहमीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातली वणी तालुक्यातील अनेक गावाच्या शेजारी बाभळी तोंडण्याचे काम करीत होते. असे असतानाही रस्ते निर्मणूष्य झाले. वाहने धावत नसल्याने काहीतरी झाले. याची विचारणा करीत ते वाहनाची वाट बघत वणी येथून पायी आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर वरोरा पोलीस स्टेशनहद्दीत अडविण्यात आले. त्यांना न. प. वरोराने उर्दू शाळेमध्ये उभारलेल्या तात्पूरत्या आसºयात ठेवण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले. क्वांरटाईनची १४ दिवसांची मुदत संपल्याने आपल्याला आता कुटुंबांकडे जाता येईल, अशी आशा होती. परंतु लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने त्यांना सोडण्याचा पेच प्रशासनासमोर उभा राहिला. भोजन, नास्ता, वैद्यकीय सुविधा, राहणे याबाबत या सातही व्यक्तींनी कुठलीही तक्रार केली नाही. व आजही करीत नाही, परंतु आता आमच्या कुटुंबियांयाकडे जावू द्या, म्हणून सकाळी नास्ता व जेवणेही घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबियाच्या ओढीने ते भुक, तहाण विसरले असल्याचे मानले जात आहे.त्या सातही व्यक्तींना लॉकडाऊनबाबतचे महत्व सांगण्यात आले. त्यांना समाजविण्यात आले असून त्यांना मतपरिवर्तन प्रत्यक्ष जावून करण्यात आले.- सचिन गोसावी, तहसीलदार, वरोरा१४ दिवस झाले इथे नास्ता जेवण व राहण्याची व्यवस्था चांगली आहे. परंतु आमचे कुटुंबीय कसे जीवन जगत असेल याची चिंता वाटत असल्याने कुटुंबियांनी चिंतेने जेवण पोटात जात नाही.- छोटेलाल कुशवाहरा,खमरीया जि. सिरोली. म. प.