लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका व समाज कार्य महाविद्यालयाद्वारे घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत कसे तयार करावयाचे, याबाबतचे धडे नागरिकांना देण्यात आले. शहरातील अष्टभुजा वार्ड येथे महिलांना एकत्र करून त्यांना घनकचºयापासून कंपोस्ट खत कसे करायचे हे समजावून सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.रोजच्या जीवनात प्रचंड प्रमाणात तयार होणाºया कचºयाचे विघटन कसे करायचे, घरातील कचºयाचा घरातच सदुपयोग कसा करता येईल, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता यावा, त्या माध्यमातून कचऱ्याची समस्या सोडविता येईल, तसेच उद्योगनिर्मितीसुद्धा करता येईल, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.स्वयंपाक घरातील ओट्यापासून निर्माण होणारा कचरा, स्वयंपाकघरातील ओला कचरा म्हणजे जैविक, कुजणारा कचरा होय. ज्याचे नैसर्गिकरित्या विघटन होऊन खत तयार होऊ शकते, मुख्यत: हे काम गृहिणीचे आहे. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंड्या, कांद्याची टरफले कागदाचे तुकडे हे गांडूळ खतासाठी वापरता येत असल्याचे यावेळी महेंद्र राळे यांनी समजावून सांगितले.इंद्रधनुष्याच्या रंगानुसार पथकाची निर्मितीबेटर चांदा मोहिमेद्वारे या युवक-युवतींची इंद्रधनुष्याच्या रंगाच्या धर्तीवर वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आले असून हे पथक शहरात विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्याचे काम करीत आहे. या युवांचा उत्साह वाखाणण्याजोगा असून चंद्रपूर शहर स्वच्छ व्हायलाच हवे, हा मूलमंत्र त्यांनी ध्यानी बाळगला आहे. आयुक्त संजय काकडे यांच्या विचारांतून या युवामोहिमेची सुरुवात करण्यात आली असून सहायक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री फेलो पूजा द्विवेदी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात युवा संपूर्ण शहरात जनजागृती करीत आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालये, प्रभाग, मोहल्ला येथे कार्यक्रम घेत आहेत.