शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:57 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती.

ठळक मुद्देतुटपुंज्या मदतीचा परिणाम : स्वेच्छेने तीन हजार शेतकऱ्यांनीच काढला विमा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती. मात्र गतवर्षीच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या तुटपुंजा मदतीच्या अनुभव पुढे असल्याने यंदाच्या खरिप हंगामात केवळ कर्जदार शेतकऱ्यांनीच विमा काढला तर हजारो बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली.खरिप २०१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कर्जदार, बिगर कर्जदार व भाडीपट्टवरील शेतकरी विम्याचा लाभ घेऊ शकतात. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबंरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदल्यास अथवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीपासून नुुकसान टाळण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते, असा दावा सरकार व विमा कंपन्यांनी केला. जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी हा विमा लागू आहे. विमा संरक्षित रक्कमेच्या दोन टक्के, नगदी व व्यापारी पिकांसाठी पाच टक्के या दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विमा कंपनीकडे २४ जुलै २०१८ प्रस्ताव सादर करावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी आयसीआयीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या कंपनीने व्यापक स्वरूपात जागृती केली नाही. परिणामी, बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमाकडे पाठ फिरवली, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.५६ हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षणकर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकाच्या संरक्षणाची हमी मिळाली. संबंधित कंपनीने योग्य माहिती संकलित करून विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी केलेल्या करारानुसार मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली.४८ हजार ४३५ विमाधारक शेतकरी कर्जदारयंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील ४८ हजार ४३५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असल्याने ही संख्या वाढू शकली; अन्यथा १० हजार शेतकरीदेखिल स्वत:हून पीक विमा काढू शकले नसते, अशी कृषी विभागातच चर्चा सुरू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित कंपनीकडे जमा झाला आहे. तुटपुंजा मोबदला मिळाला तर पुढील हंगामात बिगर कर्जदार शेतकरी विम्यापासून पुन्हा दूरावू शकतात.