शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:57 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती.

ठळक मुद्देतुटपुंज्या मदतीचा परिणाम : स्वेच्छेने तीन हजार शेतकऱ्यांनीच काढला विमा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती. मात्र गतवर्षीच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या तुटपुंजा मदतीच्या अनुभव पुढे असल्याने यंदाच्या खरिप हंगामात केवळ कर्जदार शेतकऱ्यांनीच विमा काढला तर हजारो बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली.खरिप २०१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कर्जदार, बिगर कर्जदार व भाडीपट्टवरील शेतकरी विम्याचा लाभ घेऊ शकतात. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबंरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदल्यास अथवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीपासून नुुकसान टाळण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते, असा दावा सरकार व विमा कंपन्यांनी केला. जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी हा विमा लागू आहे. विमा संरक्षित रक्कमेच्या दोन टक्के, नगदी व व्यापारी पिकांसाठी पाच टक्के या दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विमा कंपनीकडे २४ जुलै २०१८ प्रस्ताव सादर करावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी आयसीआयीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या कंपनीने व्यापक स्वरूपात जागृती केली नाही. परिणामी, बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमाकडे पाठ फिरवली, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.५६ हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षणकर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकाच्या संरक्षणाची हमी मिळाली. संबंधित कंपनीने योग्य माहिती संकलित करून विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी केलेल्या करारानुसार मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली.४८ हजार ४३५ विमाधारक शेतकरी कर्जदारयंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील ४८ हजार ४३५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असल्याने ही संख्या वाढू शकली; अन्यथा १० हजार शेतकरीदेखिल स्वत:हून पीक विमा काढू शकले नसते, अशी कृषी विभागातच चर्चा सुरू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित कंपनीकडे जमा झाला आहे. तुटपुंजा मोबदला मिळाला तर पुढील हंगामात बिगर कर्जदार शेतकरी विम्यापासून पुन्हा दूरावू शकतात.