शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:57 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती.

ठळक मुद्देतुटपुंज्या मदतीचा परिणाम : स्वेच्छेने तीन हजार शेतकऱ्यांनीच काढला विमा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती. मात्र गतवर्षीच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या तुटपुंजा मदतीच्या अनुभव पुढे असल्याने यंदाच्या खरिप हंगामात केवळ कर्जदार शेतकऱ्यांनीच विमा काढला तर हजारो बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली.खरिप २०१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कर्जदार, बिगर कर्जदार व भाडीपट्टवरील शेतकरी विम्याचा लाभ घेऊ शकतात. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबंरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदल्यास अथवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीपासून नुुकसान टाळण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते, असा दावा सरकार व विमा कंपन्यांनी केला. जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी हा विमा लागू आहे. विमा संरक्षित रक्कमेच्या दोन टक्के, नगदी व व्यापारी पिकांसाठी पाच टक्के या दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विमा कंपनीकडे २४ जुलै २०१८ प्रस्ताव सादर करावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी आयसीआयीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या कंपनीने व्यापक स्वरूपात जागृती केली नाही. परिणामी, बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमाकडे पाठ फिरवली, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.५६ हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षणकर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकाच्या संरक्षणाची हमी मिळाली. संबंधित कंपनीने योग्य माहिती संकलित करून विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी केलेल्या करारानुसार मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली.४८ हजार ४३५ विमाधारक शेतकरी कर्जदारयंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील ४८ हजार ४३५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असल्याने ही संख्या वाढू शकली; अन्यथा १० हजार शेतकरीदेखिल स्वत:हून पीक विमा काढू शकले नसते, अशी कृषी विभागातच चर्चा सुरू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित कंपनीकडे जमा झाला आहे. तुटपुंजा मोबदला मिळाला तर पुढील हंगामात बिगर कर्जदार शेतकरी विम्यापासून पुन्हा दूरावू शकतात.