शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 19, 2014 23:49 IST

ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या मानव विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जुळून राहावी यासाठी हे विद्यालये देशातील ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागातच सुरू करण्यात आले. सदर विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मात्र या विद्यालयाकडे मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. त्यामुळे येथील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.सदर विद्यालये सुरू करताना केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे जेवण, उत्कृष्ट निवास व्यवस्था, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी, शुद्ध व निर्जंतूक पाण्याची व्यवस्था, निरोगी सशक्त आरोग्य व्यवस्था, खेळण्यासाठी भव्य मैदाने, सर्व खेळाच्या साहित्याची उपलब्धता, प्रसंगानुसार खेळातील तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून खेळाडूंना मार्गदर्शन यामध्ये कुठलीही हेळसांड किंवा दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आहे. एवढेच नाही तर यासाठी भरपूर निधीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.शालेय व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळू नये किंवा रायकारण होवू नये म्हणून या विद्यालयाचे व्यवस्थापन, संंपूर्ण नियंत्रण व इतरही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राचार्य विद्यालयाचा कार्यभार सांभाळतात. या विद्यालयांमुळे देशातील ग्रामीण भागातील होतकरु, अभ्यासू व हुशार मुलांचे वडील आपल्या मुलांच्या विकासाचे स्वप्न रंगवू लागलेत. या विद्यालयात प्रवेश घेताना ८० टक्के ग्रामीण तर २० टक्के शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उंच झेपही घेतली. त्यामुळे साहजीकच या विद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता स्पर्धा वाढली. पालकसुद्धा आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मुलाचा गुणात्मक दर्जा कसा वाढेल व प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथीलल जवाहर नवोदय विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशात नाव कमविले. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, आय.ए.एस. अधिकारी बनलेत. मात्र मागील तीन वर्षांपासून या विद्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही प्रतिनिधी या विद्यालयात आले नाही. त्यामुळे प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू केला. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी विद्यालयात येवून पालक- शिक्षक समितीची बैठक घेतली होती.जिल्हाधिकाऱ्यांचे या विद्यालयाकडे झालेले दुर्लक्षामुळे येथे दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा संतुलीत व सकस आहार, नास्त्यामध्ये बिस्कीट, अंडी, फळ, दूध, विद्यार्थ्यांना लिहिण्याकरिता मिळणारे नोटबुक वही, विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रसाधन गृहाची स्वच्छता, स्टेशनरी, शुद्ध व पिण्यायोग्य पाणी, खेळाचे साहित्य व प्रशिक्षकांची सोय, शैक्षणिक सहल, या सर्व आवश्यक गोष्टीच्या आर्थिक व्यवहारात सदैव कैची चालत गेली. आजच्या स्थितीत तर, या कैचीने कहरच केला. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनात नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाविषयी चिड निर्माण झाली आणि येथील प्रकार पालकांनी चव्हाट्यावर आणला. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.