शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 19, 2014 23:49 IST

ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या मानव विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जुळून राहावी यासाठी हे विद्यालये देशातील ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागातच सुरू करण्यात आले. सदर विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मात्र या विद्यालयाकडे मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. त्यामुळे येथील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.सदर विद्यालये सुरू करताना केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे जेवण, उत्कृष्ट निवास व्यवस्था, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी, शुद्ध व निर्जंतूक पाण्याची व्यवस्था, निरोगी सशक्त आरोग्य व्यवस्था, खेळण्यासाठी भव्य मैदाने, सर्व खेळाच्या साहित्याची उपलब्धता, प्रसंगानुसार खेळातील तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून खेळाडूंना मार्गदर्शन यामध्ये कुठलीही हेळसांड किंवा दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आहे. एवढेच नाही तर यासाठी भरपूर निधीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.शालेय व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळू नये किंवा रायकारण होवू नये म्हणून या विद्यालयाचे व्यवस्थापन, संंपूर्ण नियंत्रण व इतरही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राचार्य विद्यालयाचा कार्यभार सांभाळतात. या विद्यालयांमुळे देशातील ग्रामीण भागातील होतकरु, अभ्यासू व हुशार मुलांचे वडील आपल्या मुलांच्या विकासाचे स्वप्न रंगवू लागलेत. या विद्यालयात प्रवेश घेताना ८० टक्के ग्रामीण तर २० टक्के शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उंच झेपही घेतली. त्यामुळे साहजीकच या विद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता स्पर्धा वाढली. पालकसुद्धा आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मुलाचा गुणात्मक दर्जा कसा वाढेल व प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथीलल जवाहर नवोदय विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशात नाव कमविले. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, आय.ए.एस. अधिकारी बनलेत. मात्र मागील तीन वर्षांपासून या विद्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही प्रतिनिधी या विद्यालयात आले नाही. त्यामुळे प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू केला. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी विद्यालयात येवून पालक- शिक्षक समितीची बैठक घेतली होती.जिल्हाधिकाऱ्यांचे या विद्यालयाकडे झालेले दुर्लक्षामुळे येथे दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा संतुलीत व सकस आहार, नास्त्यामध्ये बिस्कीट, अंडी, फळ, दूध, विद्यार्थ्यांना लिहिण्याकरिता मिळणारे नोटबुक वही, विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रसाधन गृहाची स्वच्छता, स्टेशनरी, शुद्ध व पिण्यायोग्य पाणी, खेळाचे साहित्य व प्रशिक्षकांची सोय, शैक्षणिक सहल, या सर्व आवश्यक गोष्टीच्या आर्थिक व्यवहारात सदैव कैची चालत गेली. आजच्या स्थितीत तर, या कैचीने कहरच केला. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनात नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाविषयी चिड निर्माण झाली आणि येथील प्रकार पालकांनी चव्हाट्यावर आणला. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.