शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

जवाहर नवोदय विद्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 19, 2014 23:49 IST

ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)ग्रामीण भागातील हुशार, होतकरु, प्रतिभासंपन्न, गरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या मानव विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जुळून राहावी यासाठी हे विद्यालये देशातील ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागातच सुरू करण्यात आले. सदर विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मात्र या विद्यालयाकडे मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. त्यामुळे येथील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.सदर विद्यालये सुरू करताना केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे जेवण, उत्कृष्ट निवास व्यवस्था, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी, शुद्ध व निर्जंतूक पाण्याची व्यवस्था, निरोगी सशक्त आरोग्य व्यवस्था, खेळण्यासाठी भव्य मैदाने, सर्व खेळाच्या साहित्याची उपलब्धता, प्रसंगानुसार खेळातील तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून खेळाडूंना मार्गदर्शन यामध्ये कुठलीही हेळसांड किंवा दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आहे. एवढेच नाही तर यासाठी भरपूर निधीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.शालेय व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळू नये किंवा रायकारण होवू नये म्हणून या विद्यालयाचे व्यवस्थापन, संंपूर्ण नियंत्रण व इतरही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राचार्य विद्यालयाचा कार्यभार सांभाळतात. या विद्यालयांमुळे देशातील ग्रामीण भागातील होतकरु, अभ्यासू व हुशार मुलांचे वडील आपल्या मुलांच्या विकासाचे स्वप्न रंगवू लागलेत. या विद्यालयात प्रवेश घेताना ८० टक्के ग्रामीण तर २० टक्के शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उंच झेपही घेतली. त्यामुळे साहजीकच या विद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता स्पर्धा वाढली. पालकसुद्धा आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मुलाचा गुणात्मक दर्जा कसा वाढेल व प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथीलल जवाहर नवोदय विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशात नाव कमविले. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, आय.ए.एस. अधिकारी बनलेत. मात्र मागील तीन वर्षांपासून या विद्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही प्रतिनिधी या विद्यालयात आले नाही. त्यामुळे प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू केला. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी विद्यालयात येवून पालक- शिक्षक समितीची बैठक घेतली होती.जिल्हाधिकाऱ्यांचे या विद्यालयाकडे झालेले दुर्लक्षामुळे येथे दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा संतुलीत व सकस आहार, नास्त्यामध्ये बिस्कीट, अंडी, फळ, दूध, विद्यार्थ्यांना लिहिण्याकरिता मिळणारे नोटबुक वही, विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रसाधन गृहाची स्वच्छता, स्टेशनरी, शुद्ध व पिण्यायोग्य पाणी, खेळाचे साहित्य व प्रशिक्षकांची सोय, शैक्षणिक सहल, या सर्व आवश्यक गोष्टीच्या आर्थिक व्यवहारात सदैव कैची चालत गेली. आजच्या स्थितीत तर, या कैचीने कहरच केला. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनात नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाविषयी चिड निर्माण झाली आणि येथील प्रकार पालकांनी चव्हाट्यावर आणला. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.