शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

४१५ ग्रामपंचायतींची रोहयोकडे पाठ

By admin | Updated: February 1, 2015 22:52 IST

बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत केंद्र शासन शंभर दिवसाचे तर राज्य

मजुरांचे स्थलांतर : २ लाख ३५ हजार जॉबकार्डधारकांना कामाची प्रतीक्षामंगेश भांडेकर - चंद्रपूरबेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत केंद्र शासन शंभर दिवसाचे तर राज्य शासनाकडून ३६५ दिवस काम मिळवून देण्याची हमी आहे. मात्र, मजुरांकडून कामाची मागणी करुनही जिल्ह्यातील तब्बल ४१५ ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे बेरोजगार मजूरांना कामासाठी स्थलांतर व्हावे लागत आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील फक्त ४३२ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे केली जात आहेत. उर्वरीत ४१५ ग्रामपंचायतीत समाविष्ठ असलेल्या नागरिकांना काम मिळत नसल्याने शहरी भागात कामासाठी जावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्यांना कामाची गरज अशांनी कामाची मागणी केल्यानंतर ५० टक्के काम ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. ३० जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींपैकी ४३२ ग्रामपंचायतींमध्ये ९१२ कामे सुरु आहेत. या कामांमुळे फक्त १६ हजार ४४ मजूरांना काम मिळाला आहे. मात्र, अर्ध्या ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरु झालेला नाही. त्यामुळे जवळपास २ लाख ३५ हजार मजूरांना कामाची प्रतीक्षा करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ५१ हजारच्या जवळपास जॉब कार्डधारक मजूर आहेत. त्यांना काम मिळवून देण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, मजूर ग्रामपंचातीकडे कामाची मागणी करुनही काम सुरु झालेली नाही. खरीप शेती हंगाम संपताच काहींनी रबी पिकांची लागवड केली. मात्र, रबी हंगामाचेही कामे आता आटोपल्याने ग्रामीण भागात शेकडो मजूर कामाच्या शोधात असून महिला व पुरुष मजूर वर्ग मिळेल ते काम करण्यासाठी धडपडत आहेत.