लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील पेपर मिल जुन्या कॉलनीतील डी.आर. क्वार्टर्स परिसर व गोकुलनगर भागात १५ दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अंधारात घराबाहेर निघणे बंद केले आहे. याबाबत वसाहतीतील नागरिकांनी बिल्ट व्यवस्थापन व वनविभागाकडे तक्रार केली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात बिबट्याचा संचार सुरू असल्याचे मान्य केले. परिसरातील पाहणी दरम्यान काही मांस विक्रेत्यांनी टाकण्यात येणारा मांस व मोकाट कुत्र्यांमुळे जंगलातील जनावरांना इथे सहज शिकार उपलब्ध होते. त्यामुळे बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगर पालिकेतर्फे अशा विक्रेत्यांना त्या परिसरात मांस न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. पेपरमील व्यवस्थापनाला क्वार्टरच्या परिसराभवती तारेचे कुंपन व योग्य असे प्रकाश दिव्याची सोय करण्याचे निर्देश वनविभागातर्फे देण्यात आली. सोबतच बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांनी दिली.परिसरात पाच कॅमेरेवनविभागाकडून या परिसरात पाच कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचाली टिपल्या जात आहे. वसाहतीत एक वनरक्षक, दोन मजुरांसह नियमीत गस्त व फटाके फोडून उपाययोजनाही सुरू केली. जेसीबीद्वारे कचरा काढला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, सावध राहावे, अशा सूचना वन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
पेपरमिल कॉलनीत बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST