लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील आकापूर गावालगत बिबटाचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी सायंकाळ्च्या सुमारात बिबटाने भाकरे यांच्या दोन बकऱ्या आणि एका कुत्र्याला ठार केले. बिबटा अजूनही झुडुपातच दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजरे लावून गस्त वाढविली आहे.मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता आकापुरात एका बिबट्याचा वावर वाढला आहे. ऐन शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बिबटाने आकापुरातील सुभाष आत्राम यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबटाने गोठ्याला जखमी करून तेथून धुम ठोकली. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरे लावले आहेत. वनविभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत आहे. बिबट्ट्याला जेरबंद करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही. माहिती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी तातडीने आकापूर घटनास्थळाला भेट दिली. अधिकाऱ्यांना कॅमेरे व पिंजरा लावण्याची सूचना केली. मृत बकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.शेतीची कामे प्रभावितनागभीड तालुक्यातील अनेक गावे जंगलाला लागून आहे. त्यामुळे गावाच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नवीन नाही. मात्र वाघ व बिबटे गावाच्या परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शेतीची कामे सुरु आहेत. शिवारातही वाघ व बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आकापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST
मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता आकापुरात एका बिबट्याचा वावर वाढला आहे. ऐन शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
आकापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिक दहशतीत
ठळक मुद्देदोन बकऱ्या व कुत्र्याला केले ठार : वनविभागाने परिसरात पिंजरे लावून वाढविली गस्त