शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडा

By admin | Updated: November 3, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान

चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष वामनराव झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. मूल, सावली, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही या भागातील शेतकऱ्यांना आसोला मेंढा तलावाचे पाणी मिळत असते. यावर्षी कमी पावसामुळे व उशिरा रोवण्या झाल्यामुळे आता धानपीक धोक्यात आले आहे. धानपिकाला पाण्याची आवश्यकता असताना संबंधित विभागाचे अधिकारी पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत असून हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार- पाच दिवसांत आसोला मेंढाचे पाणी न सोडल्यास संपूर्णत: दुष्काळाची स्थिती निर्माण होणार आहे. सावली तालुक्यात हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. तेथील पाणी फक्त गडीसुर्ला गावापुरतेच मर्यादित आहे. सदर जलसिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर असल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी बेंबाळ, नांदगाव, दिघोरीपर्यंत सोडल्यास परिसरातील धानाचे पीक वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सिंचन खात्यांना आदेश देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी झाडे यांनी केली आहे. यावेळी रामगुंडे, पिंपळकर, राकेश वानखेडे, भगत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)