शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडा

By admin | Updated: November 3, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान

चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष वामनराव झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. मूल, सावली, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही या भागातील शेतकऱ्यांना आसोला मेंढा तलावाचे पाणी मिळत असते. यावर्षी कमी पावसामुळे व उशिरा रोवण्या झाल्यामुळे आता धानपीक धोक्यात आले आहे. धानपिकाला पाण्याची आवश्यकता असताना संबंधित विभागाचे अधिकारी पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत असून हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार- पाच दिवसांत आसोला मेंढाचे पाणी न सोडल्यास संपूर्णत: दुष्काळाची स्थिती निर्माण होणार आहे. सावली तालुक्यात हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. तेथील पाणी फक्त गडीसुर्ला गावापुरतेच मर्यादित आहे. सदर जलसिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर असल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी बेंबाळ, नांदगाव, दिघोरीपर्यंत सोडल्यास परिसरातील धानाचे पीक वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सिंचन खात्यांना आदेश देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी झाडे यांनी केली आहे. यावेळी रामगुंडे, पिंपळकर, राकेश वानखेडे, भगत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)