शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

कोरोना नियमांचे पालन करुन 288 शाळेत ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ शाळेपैकी पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जुलैला १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरु होण्याच्या संख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देउपस्थितीमध्ये होतेय वाढ : विद्यार्थी आले शैक्षणिक प्रवाहात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून २८८ शाळेत ज्ञानार्जन करण्यात येत आहे. याला विद्यार्थ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ शाळेपैकी पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जुलैला १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरु होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आता  जिल्ह्यातील २८८ शाळा सुरू असून १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत ज्ञानार्जन करीत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या संख्येत होतेय वाढकोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यातील १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. ३० जुलैला जिल्ह्यातील ६१७ शाळांपैकी २८८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण पटसंख्या एक लाख २८ हजार ३५ पैकी १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. 

विद्यार्थी मजेत पालक चिंतेत...

दोन वर्षांपासून शाळा बंद होती. त्यामुळे मित्रमंडळीची भेट होत नव्हती. तसेच कोरोनाची दहशत असल्याने घराबाहेर पडतासुद्धा येत नव्हते. आता शाळा सुरू झाल्याने सर्वांसोबत खेळता येते.-रोहित गेडाम, विद्यार्थी

सतत घरी राहून कंटाळा आला होता. आता शाळेत गेल्यानंतर सर्व मित्र मिळतात. मिळून दंगामस्ती करता येते, खेळता येते. त्यामुळे शाळेत जायला मज्जा येत आहे.-प्रशांत रायपुरे, विद्यार्थी

तिसरी लाट येण्याची शक्यता असून बालकांना त्याचा धोका असल्याचे इशारा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवतांना भीती वाटते. परंतु, शाळा बंद राहिली तर शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे घाबरतच मुलाला शाळेत पाठवत आहे.-गोविंदा गेडाम, पालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा