शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आदिवासींच्या मागण्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी पुढाकार घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:23 IST

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भद्रावती येथे आदिवासी वीर-विरांगणा जयंती सोहळा

आॅनलाईन लोकमतभद्रावती : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा. आपण आपल्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवा. हे सरकार तुमचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून दिला.येथील शिंदे मंगल कार्यालयात सोमवारी गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, भद्रावतीतर्फे संपूर्ण आदिवासी वीर-विरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, नगरसेवक प्रमोद गेडाम, पंजाबराव मडावी, रमेश मेश्राम, रंजना उईके, विरेंद्र आत्राम, कांचन वरठी, मनोज आत्राम, भूपती मेश्राम, डॉ. मडावी, प्रमोद नागोसे, अजय लिहितकर, विशाल बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक भद्रानाग मंदिरापासून पेट्रोलपंप चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत जवळपास दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते. सदर रॅलीत विविध आदिवासी नृत्य करण्यात आले.रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व रमेश मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मेळाव्यात आदिवासी समाजातील महापुरुषांना मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक अशोक तुमराम यांनी केले. संचालन प्रा. अविनाश यांनी तर आभार गितेश कुळमेथे यांनी मानले.