शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

नेत्यांचेही आता ‘सर्जिकल स्ट्राईक्स’

By admin | Updated: October 16, 2016 00:44 IST

प्रतिकूल आरक्षण आल्याने येथील काही नेत्यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी सुरक्षित गटात किंवा गणात निवडणुकीचे ...

राजकीय अस्तित्वाचा प्रश्न : आरक्षणाने बिघडविले पुढाऱ्यांचे समीकरणघनश्याम नवघडे नागभीडप्रतिकूल आरक्षण आल्याने येथील काही नेत्यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी सुरक्षित गटात किंवा गणात निवडणुकीचे ‘सर्जिकल आॅपरेशन’ करावे लागणार आहे. यात भाजप आणि काँग्रेस या पक्षातील नेत्यांचा समावेश राहणार आहे.नागभीड तालुक्यात येणारा वर्ष निवडणूक वर्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व नागभीड नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांच्या निवडणुका नागभीड तालुक्यात याच वर्षात येणार आहेत. यापैकी अनेकांचा डोळा नगरपरिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर होता. पण आश्चर्य असे की या दोन्ही स्वराज्य संस्थांचे आरक्षण अनेकांना प्रतिकूल आहे. त्यामुळे अनेकांवर राजकीय वनवासाची पाळी आली आहे. हे राजकीय वनवास टाळण्यासाठी यातील काहींनी राजकीय सर्जिकल आॅपरेशन करण्याची तयारी चालविली आहे.मिळालेल्या संकेताप्रमाणे येथील जिल्हा भाजपाचे महामंत्री संजय गजपुरे अनेक दिवसांपासून राजकारणात आहेत. पण एक अपवाद वगळला तर सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय जुगार ते कधीही खेळले नाही. म्हणूनच येथे नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेवर त्यांचा डोळा होता. पण झाले उलटे. येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. म्हणूनच त्यांनी आता आपला मोर्चा लगतच्या पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाकडे वळविला आहे.गजपुरे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे दिनेश गावंडे हेसुद्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. पण आलेल्या आरक्षणाने त्यांचाही हिरमोड झाला आहे. आता गावंडे एक तर पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाची निवड करतील किंवा पारडी व कान्पा या दोन गणांपैकी एका गणाला प्राधान्य देतील, हे तुर्तास त्यांनाच ठाऊक. जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती ईश्वर मेश्राम यांचा गृह गट हा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाला आहे. त्यांनाही आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे आहे. यासाठी ते त्यांच्या पत्नीला या गटातून राजकीय मैदानात उतरवतात की स्वत: अन्य गटाची किंवा गणाची निवड करतात, यावरही बऱ्याच चर्चा रंगत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे हे तालुक्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ. मौशी- कान्पा आणि पारडी- मिंडाळा या दोन गटापैकी एक तरी गट त्यांना अनुकूल येईल, कशी त्यांची अपेक्षा होती. पण हे दोन्ही गट त्यांच्यासाठी प्रतिकूल आल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्त ते ‘नाही’ म्हणून असले तरी पं.स. चे दोन गण या तालुक्यात अनुकूल आहेत. यापैकी ते एकाची निवड करतील. नाही तर ते आपला मोर्चा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.