शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नेत्यांचेही आता ‘सर्जिकल स्ट्राईक्स’

By admin | Updated: October 16, 2016 00:44 IST

प्रतिकूल आरक्षण आल्याने येथील काही नेत्यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी सुरक्षित गटात किंवा गणात निवडणुकीचे ...

राजकीय अस्तित्वाचा प्रश्न : आरक्षणाने बिघडविले पुढाऱ्यांचे समीकरणघनश्याम नवघडे नागभीडप्रतिकूल आरक्षण आल्याने येथील काही नेत्यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी सुरक्षित गटात किंवा गणात निवडणुकीचे ‘सर्जिकल आॅपरेशन’ करावे लागणार आहे. यात भाजप आणि काँग्रेस या पक्षातील नेत्यांचा समावेश राहणार आहे.नागभीड तालुक्यात येणारा वर्ष निवडणूक वर्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व नागभीड नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांच्या निवडणुका नागभीड तालुक्यात याच वर्षात येणार आहेत. यापैकी अनेकांचा डोळा नगरपरिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर होता. पण आश्चर्य असे की या दोन्ही स्वराज्य संस्थांचे आरक्षण अनेकांना प्रतिकूल आहे. त्यामुळे अनेकांवर राजकीय वनवासाची पाळी आली आहे. हे राजकीय वनवास टाळण्यासाठी यातील काहींनी राजकीय सर्जिकल आॅपरेशन करण्याची तयारी चालविली आहे.मिळालेल्या संकेताप्रमाणे येथील जिल्हा भाजपाचे महामंत्री संजय गजपुरे अनेक दिवसांपासून राजकारणात आहेत. पण एक अपवाद वगळला तर सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय जुगार ते कधीही खेळले नाही. म्हणूनच येथे नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेवर त्यांचा डोळा होता. पण झाले उलटे. येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. म्हणूनच त्यांनी आता आपला मोर्चा लगतच्या पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाकडे वळविला आहे.गजपुरे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे दिनेश गावंडे हेसुद्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. पण आलेल्या आरक्षणाने त्यांचाही हिरमोड झाला आहे. आता गावंडे एक तर पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाची निवड करतील किंवा पारडी व कान्पा या दोन गणांपैकी एका गणाला प्राधान्य देतील, हे तुर्तास त्यांनाच ठाऊक. जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती ईश्वर मेश्राम यांचा गृह गट हा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाला आहे. त्यांनाही आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे आहे. यासाठी ते त्यांच्या पत्नीला या गटातून राजकीय मैदानात उतरवतात की स्वत: अन्य गटाची किंवा गणाची निवड करतात, यावरही बऱ्याच चर्चा रंगत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे हे तालुक्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ. मौशी- कान्पा आणि पारडी- मिंडाळा या दोन गटापैकी एक तरी गट त्यांना अनुकूल येईल, कशी त्यांची अपेक्षा होती. पण हे दोन्ही गट त्यांच्यासाठी प्रतिकूल आल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्त ते ‘नाही’ म्हणून असले तरी पं.स. चे दोन गण या तालुक्यात अनुकूल आहेत. यापैकी ते एकाची निवड करतील. नाही तर ते आपला मोर्चा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.