शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सिंदेवाही तालुक्यात दुग्ध व्यवसायाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:20 IST

शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देदूध प्रकल्प : शेतकरी व परिसरातील बेरोजगारांसाठी एक आदर्श

बाबुराव परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता सिंदेवाही येथील सुनील व अनिल उट्टलवार बंधूंनी सिंदेवाही येथे दूध डेअरी प्रकल्प सुरु करुन सिंदेवाही व तालुक्यातील शेतकºयांना दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचा संदेश दिला आहे. यासोबतच बेरोजगारांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.सिंदेवाही परिसरात दुधाची टंचाई लक्षात घेवून उट्टलवार बंधंूनी सिंदेवाहीत मदर डेअरी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी मुर्रा जातीच्या १४ म्हशी व साहिवाल जातीच्या चार गायी विकत घेतल्या. या म्हशी व गायीपासून रोज १२० लिटर दुधाचे उत्पादन होते. उत्पादित झालेले दूध ते मदर डेअरीला देतात. दुधात गुणवत्ता असल्याने उत्पादित केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लिटर भाव मिळत आहे. त्यांनी सिंदेवाही येथे मदर डेअरीचे संकलन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे शेतकºयांनी आणलेले दूध मदर डेअरी केंद्रात जमा केले जाते. दुध संकलन केंद्रावर शितकरण करण्याचे यंत्र आहे. म्हशीच्या देखभालीसाठी त्यांनी नियमित तीन मजूर ठेवले आहेत. प्रत्येकाला त्यांनी कामे वाटून दिली आहेत. दुध उत्पादक वैरणासाठी त्यांनी आपल्या शेतात डिएचएन- ६ यशवंत जयवंत गवत व मालदांडी ज्वारीची दोन एकरमध्ये लागवड केली आहे. ते तणसाचे वापर फार कमी प्रमाणात करतात. ते नेहमी कुटार आणि गव्हांडाचा वापर करतात. मजूर, गुराचे खाद्य आणि औषधी याचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्यांना साधारणत: ४० ते ५० हजार रुपयांचा फायदा होत आहे. उट्टलवार यांना आता पशुधनाचा अभ्यास झाला आहे. पशुधनावर सर्वसाधारण आजार उद्भवल्यास ते स्वत:च त्यांच्यावर उपचार करतात. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास ते येथील पशु डॉक्टरकडे घेवून जातात. सिंदेवाही तालुक्यातील शेतकºयांना दुधाच्या विक्रीसाठी प्रत्येक दहा- पंधरा किलोमीटरवर मदर डेअरीच्या माध्यमातून राजोली, इटोली, वासेरा, वाकल, नवरगाव, पळसगाव, तळोधी आदी गावावरुन दुध सिंदेवाही येथे मदर डेअरी केंद्रावर आणले जात आहे. दररोज ७०० लिटर दूध संकलन केंद्रावर जमा होते. त्यामुळे दुधाला चांगले भाव मिळू लागले आहे. या योजनेअंतर्गत ३५० ते ४०० शेतकरी सहभागी झाले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी शेत मालावर आधारित उद्योग सुरु करुन तालुक्यातील युवकांनी पूरक उद्योग व्यवसाय केल्यास बेरोजगारीवर मात करता येईल. सिंदेवाही व तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासनाने शेतकºयांना गाय व म्हशीचे वाटप करुन प्रोत्साहन द्यावे, असे मत सुनील उट्टलवार यांनी व्यक्त केले.