शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

अखेरचा प्रवासही होतो येथे त्रासदायक !

By admin | Updated: March 1, 2015 00:44 IST

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे रेंगाळत आहे.मनुष्य समाज जीवनात वावरत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्याच्या शेवटच्याक्षणी इहलोकाची यात्रा सुखाची जावी अशी सर्वाची अपेक्षा असते. परंतु सिंदेवाही येथील स्मशानभूमीत उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतरही सिंदेवाही नगरात अद्यापही समस्या कायम आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेले येथील स्मशानभूमी पाच वर्षापासून केवळ देखावा ठरलेली आहे. या स्मशानभूमीतील शवदाहिनी पाच वर्षापासून बेपत्ता आहे. तसेच टिन शेड दोन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडमधून पाणी गळते. सद्य:स्थितीत स्मशानभूमीवरील तुटलेल्या टिन गायब झाल्या आहे. आता केवळ लोखंडी खांब उभे आहेत. अशा प्रतीकुल परिस्थितीत नागरिकांना उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडवा लागत आहे. स्मशानभूमी परिसराला संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीत वीज व्यवस्था नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक प्रशासनाने या स्मशानभूमीत शवदाहिनी व टिन शेड लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. शासन जनतेच्या विकासासाठी वर्षानुवर्षे लाखो रुपये खर्च करीत असले तरी गावाचा विकास मात्र होत नसल्याचे दिसून येते. या स्मशानभूमीत शवदाहिनी व शेडवर टिनाची नवीन पत्रे बसविणे, विद्युत व्यवस्था, स्मशानभूमीवरील जागेवरचे अतिक्रमण हटविणे तसेच शोकसभा घेण्याकरिता सभागृह बांधणे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)