शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा प्रवासही होतो येथे त्रासदायक !

By admin | Updated: March 1, 2015 00:44 IST

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे रेंगाळत आहे.मनुष्य समाज जीवनात वावरत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्याच्या शेवटच्याक्षणी इहलोकाची यात्रा सुखाची जावी अशी सर्वाची अपेक्षा असते. परंतु सिंदेवाही येथील स्मशानभूमीत उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतरही सिंदेवाही नगरात अद्यापही समस्या कायम आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेले येथील स्मशानभूमी पाच वर्षापासून केवळ देखावा ठरलेली आहे. या स्मशानभूमीतील शवदाहिनी पाच वर्षापासून बेपत्ता आहे. तसेच टिन शेड दोन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडमधून पाणी गळते. सद्य:स्थितीत स्मशानभूमीवरील तुटलेल्या टिन गायब झाल्या आहे. आता केवळ लोखंडी खांब उभे आहेत. अशा प्रतीकुल परिस्थितीत नागरिकांना उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडवा लागत आहे. स्मशानभूमी परिसराला संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीत वीज व्यवस्था नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक प्रशासनाने या स्मशानभूमीत शवदाहिनी व टिन शेड लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. शासन जनतेच्या विकासासाठी वर्षानुवर्षे लाखो रुपये खर्च करीत असले तरी गावाचा विकास मात्र होत नसल्याचे दिसून येते. या स्मशानभूमीत शवदाहिनी व शेडवर टिनाची नवीन पत्रे बसविणे, विद्युत व्यवस्था, स्मशानभूमीवरील जागेवरचे अतिक्रमण हटविणे तसेच शोकसभा घेण्याकरिता सभागृह बांधणे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)