शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:04 IST

तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देमोहीम सुरूच। ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत संस्था, संघटनांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला. मोहिमेच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यात १७ लाख ५ हजार ८९८ तर संपूर्ण राज्यात २ कोटी ३२ लाख ८९ हजार ६१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.‘५० कोटी वृक्षलागवड’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात १ जुलैला पहिल्याच दिवशी २ लाख ११ हजार ८०२ झाडे, दुसऱ्या दिवशी २ जुलै रोजी २ लाख ३९ हजार १९६ झाडे लावण्यात आली. ३ जुलैला २ लाख ८१ हजार ८४४ तर ४ जुलैला ३ लाख ६० हजार ४७० झाडे लावण्यात आली.या मोहिमेच्या पाचव्या दिवशी ६ लाख १२ हजार ५८६ झाडे लावण्यात आली आहे. मानवाने निसर्गाकडून फक्त घेण्याचेच काम केले आहे. आता वेळ आहे निसर्गाला परतफेड करण्याची. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांसोबतच सर्वसामान्य नागरिक, विविध संस्था व संघटनांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग व्हावे, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्त व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.घुग्घुस शहरात दीड हजार वृक्ष लागवडघुग्घुस : शहरात दीड हजार वृक्ष लागवड करण्यात आले. पहिल्या दिवशी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, घुग्गुसचे सरपंच, वेकोलिचे उपमहाप्रबंधक व ठाणेदार उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी वृक्षदिंडी व स्वच्छता रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. श्री गुरूदेव सेवा मंडळ, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून वृक्षारोपणाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. वृक्षदिंडीच्या दुसºया दिवशी चंद्रपूर तालुक्यातील घग्गुस, मोरवा या गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. भद्रावती तालुक्यातील मासळ व माजरी येथे दिंडी पोहोचताच गावकऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग