शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू लपलेले

By admin | Updated: November 26, 2015 00:50 IST

ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात ...

राजकुमार चुनारकर खडसंगीग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मितीची गरज असून यासाठी कुणीतरी पुढे येण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.रविवार व सोमवार सलग दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी चिमूर तालुक्यातील कोलारा येथील संसारा रिसार्ट येथे मुक्कामी असताना त्यांना कोलारा गेटवर सफारी करून आल्यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गाठले असता मनमोकळ्यापणे अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मुळचा बंगलोर येथील असलेले अनिल कुंबळे म्हणाले की, क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर वेळ असल्याने व पर्यटनाची आवड असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलो. ताडोबा येथील प्रकल्पात पहिल्या दिवशी वाघाचे दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी वाघ मिळाले नाहीत मात्र दुसऱ्या दिवशी जंगलाचा खूप आनंद घेतला. पर्यटकांनी वाघ पाहण्यासाठीच येवू नये तर जंगलातील इतर बाबीही बघून आनंद घेण्याचा सल्लाही इतर पर्यटकांना यावेळी दिला.माझी बंगलोर येथे पर्यावरणावर काम करणारी संस्था असून या विषयावर काम करणे मला आवडते. बंगलोर येथील पर्यटनापेक्षा महाराष्ट्रातील ताडोबा येथील पर्यटन क्षेत्र चांगले असल्याचेही कुंबळे यांनी सांगितले.आजचा क्रिकेट खेळ फास्ट झाला आहे. त्यामुळेच टी-२० सारखे सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर यामधूनच नवीन उद्योनमुख क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. क्रिकेट फास्ट झाल्यामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात प्रेक्षकांच्या संख्येवरुन कमी झाल्याचे दिसत असल्याचा खेद व्यक्त करीत नागपूर येथे कसोटी सामना पाहण्याच्या दृष्टीनेही मी आपल्या महाराष्ट्रात (विदर्भात) आलो आहे.आपल्या क्रिकेट जिवनातील प्रसंग सांगतांना कुंबले म्हणाला, फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तान विरुद्ध मी फिरकी गोलंदाजीवर घेतलेल्या दहा बळीमुळे भारताला सामना जिंकून दिला ही माझ्या कारकीर्दीतील उत्तम कामगिरी आहे तर दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) बंगलोर येथील होम ग्राऊंडवर आस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एक दिवशीय सामन्यात श्रीनाथ व मी केलेली फलंदाजीतून मिळालेला विजय हा एक क्षण माझ्या कारकिर्दीतील आठवणीचा आहे. कारण या सामन्यात माझी आई तथा श्रीनाथची आई सामना बघत होती. त्यामुळे हा सामना माझ्या जीवनात महत्त्वाचा असल्याचेही अनिल कुंबळे यांनी सांगितले.क्रिकेटमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. नवीन नवीन नियम तयार होवून क्रिकेट हा बदलत्या काळानुसार झटपट झाला आहे. या झटपट क्रिकेट (टी-२०) मुळे अनेक युवा क्रिकेटपटू पुढे येत आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कसोटी, एक दिवसीय, व टी-२० असा वेगवेगळा संघाची निर्मिती करण्याकरिता चांगले क्रिकेटपटू देशात उपलब्ध होत असल्याने भारतीय क्रिकेटला चांगले दिवस असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले.