शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू लपलेले

By admin | Updated: November 26, 2015 00:50 IST

ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात ...

राजकुमार चुनारकर खडसंगीग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्रत्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मितीची गरज असून यासाठी कुणीतरी पुढे येण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.रविवार व सोमवार सलग दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी चिमूर तालुक्यातील कोलारा येथील संसारा रिसार्ट येथे मुक्कामी असताना त्यांना कोलारा गेटवर सफारी करून आल्यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गाठले असता मनमोकळ्यापणे अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मुळचा बंगलोर येथील असलेले अनिल कुंबळे म्हणाले की, क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर वेळ असल्याने व पर्यटनाची आवड असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलो. ताडोबा येथील प्रकल्पात पहिल्या दिवशी वाघाचे दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी वाघ मिळाले नाहीत मात्र दुसऱ्या दिवशी जंगलाचा खूप आनंद घेतला. पर्यटकांनी वाघ पाहण्यासाठीच येवू नये तर जंगलातील इतर बाबीही बघून आनंद घेण्याचा सल्लाही इतर पर्यटकांना यावेळी दिला.माझी बंगलोर येथे पर्यावरणावर काम करणारी संस्था असून या विषयावर काम करणे मला आवडते. बंगलोर येथील पर्यटनापेक्षा महाराष्ट्रातील ताडोबा येथील पर्यटन क्षेत्र चांगले असल्याचेही कुंबळे यांनी सांगितले.आजचा क्रिकेट खेळ फास्ट झाला आहे. त्यामुळेच टी-२० सारखे सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर यामधूनच नवीन उद्योनमुख क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. क्रिकेट फास्ट झाल्यामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात प्रेक्षकांच्या संख्येवरुन कमी झाल्याचे दिसत असल्याचा खेद व्यक्त करीत नागपूर येथे कसोटी सामना पाहण्याच्या दृष्टीनेही मी आपल्या महाराष्ट्रात (विदर्भात) आलो आहे.आपल्या क्रिकेट जिवनातील प्रसंग सांगतांना कुंबले म्हणाला, फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तान विरुद्ध मी फिरकी गोलंदाजीवर घेतलेल्या दहा बळीमुळे भारताला सामना जिंकून दिला ही माझ्या कारकीर्दीतील उत्तम कामगिरी आहे तर दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) बंगलोर येथील होम ग्राऊंडवर आस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एक दिवशीय सामन्यात श्रीनाथ व मी केलेली फलंदाजीतून मिळालेला विजय हा एक क्षण माझ्या कारकिर्दीतील आठवणीचा आहे. कारण या सामन्यात माझी आई तथा श्रीनाथची आई सामना बघत होती. त्यामुळे हा सामना माझ्या जीवनात महत्त्वाचा असल्याचेही अनिल कुंबळे यांनी सांगितले.क्रिकेटमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. नवीन नवीन नियम तयार होवून क्रिकेट हा बदलत्या काळानुसार झटपट झाला आहे. या झटपट क्रिकेट (टी-२०) मुळे अनेक युवा क्रिकेटपटू पुढे येत आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कसोटी, एक दिवसीय, व टी-२० असा वेगवेगळा संघाची निर्मिती करण्याकरिता चांगले क्रिकेटपटू देशात उपलब्ध होत असल्याने भारतीय क्रिकेटला चांगले दिवस असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले.