शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान

By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST

कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांनाही फटका : अनेक घरांची अंशत: पडझडलोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी :कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत टिनपत्रे उडाल्यामुळे काही जनावरेदेखील जखमी झाली आहेत. वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजकुमार गौरकार व इतर शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ओले झाले. अनिल जगताप यांचा कापसाचा ढिग बाहेर असल्याने वादळामुळे उडून गेला तर काही ढिगारे जमीनदोस्त झाले. तुकाराम बांदुरकर यांच्या सुमो या वाहनावर झाड पडल्याने काचा फुटल्या. रेणुका लोखंडे या ८० वर्षीय वृध्देच्या घराचे छप्पर उडाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. प्रचंड वेगात वादळ आल्याने अतिशय जुने झाड घरावर कोसळले. या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. गावातील जवळजवळ ५० टक्के लोकांच्या घरांवरील छप्पर या वादळामुळे उडाले. अनेक नागरिकांची मातीची घरे आहेत. वादळ व पावसामुळे या घराच्या मातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. गावातील विद्युत खांबसुद्धा वाकल्याने विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.चक्रीवादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निमणी-राजुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निमणी, बाखडीॅ, लखमापूर, धुनकी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. अनेक ग्रामस्थ आपल्या घरावरील उडालेल्या छपराचा शोध घेत होते. अनेकांच्या घरातील टी.व्ही.,फ्रीजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यधान्याचे नुकसानचक्रीवादळ व पावसामुळे लोकांच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे घरातील साठवून ठेवलेले गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य ओले झाले. काही मोटरसायकल, सुमो गाडीच्या काचा फुटल्या. बाहेर ठेवलेला शेतकऱ्याचा कापूस वादळामुळे उडून गेला तर काही ओला होऊन जमनीदोस्त झाला. मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निमणी, बाखडीॅ, हिरापूर, धुनकी, तळोधी येथील शेतकऱ्यानी केली आहे.