शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान

By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST

कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांनाही फटका : अनेक घरांची अंशत: पडझडलोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी :कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत टिनपत्रे उडाल्यामुळे काही जनावरेदेखील जखमी झाली आहेत. वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजकुमार गौरकार व इतर शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ओले झाले. अनिल जगताप यांचा कापसाचा ढिग बाहेर असल्याने वादळामुळे उडून गेला तर काही ढिगारे जमीनदोस्त झाले. तुकाराम बांदुरकर यांच्या सुमो या वाहनावर झाड पडल्याने काचा फुटल्या. रेणुका लोखंडे या ८० वर्षीय वृध्देच्या घराचे छप्पर उडाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. प्रचंड वेगात वादळ आल्याने अतिशय जुने झाड घरावर कोसळले. या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. गावातील जवळजवळ ५० टक्के लोकांच्या घरांवरील छप्पर या वादळामुळे उडाले. अनेक नागरिकांची मातीची घरे आहेत. वादळ व पावसामुळे या घराच्या मातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. गावातील विद्युत खांबसुद्धा वाकल्याने विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.चक्रीवादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निमणी-राजुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निमणी, बाखडीॅ, लखमापूर, धुनकी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. अनेक ग्रामस्थ आपल्या घरावरील उडालेल्या छपराचा शोध घेत होते. अनेकांच्या घरातील टी.व्ही.,फ्रीजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यधान्याचे नुकसानचक्रीवादळ व पावसामुळे लोकांच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे घरातील साठवून ठेवलेले गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य ओले झाले. काही मोटरसायकल, सुमो गाडीच्या काचा फुटल्या. बाहेर ठेवलेला शेतकऱ्याचा कापूस वादळामुळे उडून गेला तर काही ओला होऊन जमनीदोस्त झाला. मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निमणी, बाखडीॅ, हिरापूर, धुनकी, तळोधी येथील शेतकऱ्यानी केली आहे.