शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान

By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST

कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांनाही फटका : अनेक घरांची अंशत: पडझडलोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी :कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत टिनपत्रे उडाल्यामुळे काही जनावरेदेखील जखमी झाली आहेत. वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजकुमार गौरकार व इतर शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ओले झाले. अनिल जगताप यांचा कापसाचा ढिग बाहेर असल्याने वादळामुळे उडून गेला तर काही ढिगारे जमीनदोस्त झाले. तुकाराम बांदुरकर यांच्या सुमो या वाहनावर झाड पडल्याने काचा फुटल्या. रेणुका लोखंडे या ८० वर्षीय वृध्देच्या घराचे छप्पर उडाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. प्रचंड वेगात वादळ आल्याने अतिशय जुने झाड घरावर कोसळले. या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. गावातील जवळजवळ ५० टक्के लोकांच्या घरांवरील छप्पर या वादळामुळे उडाले. अनेक नागरिकांची मातीची घरे आहेत. वादळ व पावसामुळे या घराच्या मातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. गावातील विद्युत खांबसुद्धा वाकल्याने विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.चक्रीवादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निमणी-राजुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निमणी, बाखडीॅ, लखमापूर, धुनकी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. अनेक ग्रामस्थ आपल्या घरावरील उडालेल्या छपराचा शोध घेत होते. अनेकांच्या घरातील टी.व्ही.,फ्रीजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यधान्याचे नुकसानचक्रीवादळ व पावसामुळे लोकांच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे घरातील साठवून ठेवलेले गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य ओले झाले. काही मोटरसायकल, सुमो गाडीच्या काचा फुटल्या. बाहेर ठेवलेला शेतकऱ्याचा कापूस वादळामुळे उडून गेला तर काही ओला होऊन जमनीदोस्त झाला. मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निमणी, बाखडीॅ, हिरापूर, धुनकी, तळोधी येथील शेतकऱ्यानी केली आहे.