शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

कोसळधारमुळे शेतपिकांसह रस्त्येही गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

जिवतीत घरांसह दुकानात घुसले पाणी जिवती : शहरातील शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला आहे. ...

जिवतीत घरांसह दुकानात घुसले पाणी

जिवती : शहरातील शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला आहे. या नाल्याला आलेल्या पुरामुळे लगतच्या अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील जांबळे रेडिमेड कापड दुकान, दर्शन फोटो स्टुडिओ, गोरे संगणक ग्राहक सेवा केंद्र आणि घोडके संगणक ग्राहक सेवा केंद्र यांच्या दुकानात पाणी शिरले. त्यामुळे कापड दुकानातील कपडे वाहून गेले. एवढेच नाही तर ग्राहक सेवा केंद्रातील संगणक व पीसीओसुद्धा साचलेल्या पाण्यामुळे निकामी झाले आहेत. पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

कोरपना तालुक्यात कपाशी, सोयाबीनचे उभे पीक झाले आडवे

कोरपना : मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या संततधार पावसाचा फटका शेतीला बसला आहे. कोरपना तालुक्यातील अनेक शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीक आडवे झाले आहे, तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती फुलविली. पीक चांगले आले. मात्र, पावसामुळे कपाशीचे उभे पीक आडवे झाले आहे.

कोरपना येथील शेतकरी दीपक पारखी यांच्या शेतातील कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, कोरपना तालुक्यात कपाशीसह सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ‘औद्योगिक तालुका’ अशी ओळख असली तरी बहुतांश नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेतात पिकले तरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खत, निंदण, खुरपण करून मोठ्या कष्टाने जपणूक केली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलच मोठा फटका बसला.

अमलनाला धरण विहंगमय

कोरपना : कोरपना, राजुरा आणि जिवती तालुक्यांच्या सीमेवर असलेले अमलनाला धरण ओसंडून वाहू लागले आहे. उद्योगांसह, शेतीला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, वर्षभर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

बल्लारपुरात पुरातन किल्ल्याची भिंत कोसळली

बल्लारपूर : बल्लारशाह तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, पुरातत्व विभागाकडून या वारशाची योग्य देखभाल- दुरुस्ती केली जात नसल्यामुळे आता हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालच्या पावसामुळे किल्ल्याची भिंत कोसळली. यामुळे आतातरी संवर्धन करण्याची मागणी होत आहे.

डोंगरगाव-डाम मार्ग बंद

राजुरा : तालुक्यातील डोंगरगाव- डाम मार्गावर डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना सुविधा झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे हा डांबरी रस्ता अक्षरश: वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून, वाहतुकीसाठी मार्ग बंद झाला आहे.

घराची भिंत कोसळली

राजुरा : तालुक्यातील काही गावांतील घरांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, देवाडा येथील घरांची पडझड झाली आहे. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सावलहिला नाल्यावरील रपटा गेला वाहून

कोरपना : कोरपना तालुक्यातील खैरगावकडून सावलहिरा गावाकडे जाणाऱ्या नाल्यावर असलेला रपटा गुरुवारी वाहून गेला. यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्या- येण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, नाल्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात शेती आहे. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे शेतऱ्यांनाही यामुळे त्रास होणार आहे. या नाल्यावर बांधकाम विभागाकडून पूल बांधण्यात येत आहे. मात्र, बांधकाम अर्धेच झाले आहे.

धाबा-पोळसा रपटा गेला वाहून

धाबा : गोंडपिपरी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा धाबा- पोडसा या मार्गावरील असलेल्या नाल्यावरील रपटा वाहून गेला. या मार्गावरील हेटीनांदगाव, चकमूर येथीलही रस्ते वाहून गेले. यामुळे दोन गावांतील संपर्क तुटला आहे. नाल्याला मोठ्या प्रमाणात प्रवाह असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, नवा रपटा बनविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

विसापूर परिसरात शेतात पाणी

विसापूर : विसापूर परिसरात असलेल्या नाल्यामुळे अनेक शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहे.

जाळीच्या कुंपणासह हळदपिकाचे नुकसान

नांदा : येथील शेतकरी ठणू पाचाभाई यांंचा शेतातील हळद, सोयाबीन पीक वाहून गेले. विशेष म्हणजे, त्यांनी शेताला कुंपण केले होते. या कुंपणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी केली. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.