शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनो! नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या

By admin | Updated: February 23, 2017 00:41 IST

पाणी हे जीवन आहे. असे संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या परिसरात छोट्या मोठ्या नद्या व तलाव आहेत.

नदीचे पाणी दूषित : प्रशासनाने जनजागृती करावीचंद्रपूर : पाणी हे जीवन आहे. असे संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या परिसरात छोट्या मोठ्या नद्या व तलाव आहेत. त्या देवस्थानावर विविध दिनाचे औचित्य साधून जत्रा, यात्रा भरत असतात. त्यावेळी भाविकांकडून विविध प्रकारचे साहित्य हे नादीत मोठ्या प्रमाणात टाकले जाते.परिणामी नद्या दूषित होत आहेत. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नदीकाठावरील देवस्थानात भाविकांची गर्दी असते. देवाची पूजा-अर्चा करायला आलेले भाविक महाप्रसाद म्हणून भोजनदान देतात. मात्र, त्याच ठिकाणी सतत वाहनत असणाऱ्या नदीपात्रात स्वयंपाकाचे उरलेले अन्न व कचरा टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसत असून नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे.परिणामी सतत वाहणारे शुद्ध पाणी पिण्यायोग्य राहात नसून या अशुद्ध पाण्याचा पुरवठा पिण्याच्या टाकीतून इतर गावांना होतो. परिणामी, अनेकदा जनतेचे आरोग्य बिघडते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. याठिकांणी अनेक प्रांतातून दूरवरुन या ठिकाणी भक्तगण येतात. माता-पित्याच्या अस्थीचे येथे विसर्जन केले जाते. नवस फेडले जातात. यावर्षी २४ फेब्रुवारीला यात्रा भरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी राहणार आहे. पण, स्वच्छता पाळल्या न गेल्यास दुर्गंधी, दूषित पाणी या ठिकाणी दिसून येणार आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.तसेच स्वत:च भाविकांनी नद्यांच्या स्वच्छेची काळजी घ्यावी, नद्या प्रदूषणमुक्त होतील. तसेच प्रशासनाने नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी विविध पातळीवर उपक्रम राबवावे. अशी मागणी जिल्ह्यातील सुज्ञ व्यक्तीकडून केल्या जात आहे. (नगर प्रतिनिधी)महाशिवरात्रीनिमित्य अनेक ठिकाणी यात्राचंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकांणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. यावेळी अनेक भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. याठिकांणी भाविकांची अलोट गर्दी असते. पण भाविकांकडून स्वच्छता पाळल्या जात नाही. त्यामुळे पाणी दूषित होते. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे भाविकांनीच स्वत: नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.