शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

भाविकांनो! नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या

By admin | Updated: February 23, 2017 00:41 IST

पाणी हे जीवन आहे. असे संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या परिसरात छोट्या मोठ्या नद्या व तलाव आहेत.

नदीचे पाणी दूषित : प्रशासनाने जनजागृती करावीचंद्रपूर : पाणी हे जीवन आहे. असे संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या परिसरात छोट्या मोठ्या नद्या व तलाव आहेत. त्या देवस्थानावर विविध दिनाचे औचित्य साधून जत्रा, यात्रा भरत असतात. त्यावेळी भाविकांकडून विविध प्रकारचे साहित्य हे नादीत मोठ्या प्रमाणात टाकले जाते.परिणामी नद्या दूषित होत आहेत. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नदीकाठावरील देवस्थानात भाविकांची गर्दी असते. देवाची पूजा-अर्चा करायला आलेले भाविक महाप्रसाद म्हणून भोजनदान देतात. मात्र, त्याच ठिकाणी सतत वाहनत असणाऱ्या नदीपात्रात स्वयंपाकाचे उरलेले अन्न व कचरा टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसत असून नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे.परिणामी सतत वाहणारे शुद्ध पाणी पिण्यायोग्य राहात नसून या अशुद्ध पाण्याचा पुरवठा पिण्याच्या टाकीतून इतर गावांना होतो. परिणामी, अनेकदा जनतेचे आरोग्य बिघडते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. याठिकांणी अनेक प्रांतातून दूरवरुन या ठिकाणी भक्तगण येतात. माता-पित्याच्या अस्थीचे येथे विसर्जन केले जाते. नवस फेडले जातात. यावर्षी २४ फेब्रुवारीला यात्रा भरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी राहणार आहे. पण, स्वच्छता पाळल्या न गेल्यास दुर्गंधी, दूषित पाणी या ठिकाणी दिसून येणार आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.तसेच स्वत:च भाविकांनी नद्यांच्या स्वच्छेची काळजी घ्यावी, नद्या प्रदूषणमुक्त होतील. तसेच प्रशासनाने नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी विविध पातळीवर उपक्रम राबवावे. अशी मागणी जिल्ह्यातील सुज्ञ व्यक्तीकडून केल्या जात आहे. (नगर प्रतिनिधी)महाशिवरात्रीनिमित्य अनेक ठिकाणी यात्राचंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकांणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. यावेळी अनेक भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. याठिकांणी भाविकांची अलोट गर्दी असते. पण भाविकांकडून स्वच्छता पाळल्या जात नाही. त्यामुळे पाणी दूषित होते. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे भाविकांनीच स्वत: नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.