शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पावसाअभावी पिके कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:52 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचा हंगाम मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतो. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का, होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते, आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोमेजली आहे.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : सरासरी उत्पन्नाचीही आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचा हंगाम मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतो. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का, होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते, आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोमेजली आहे. शेतातील काही पिके नष्टही होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. पावसाअभावी कृषी उत्पादनात घट होण्याचा शक्यता वर्तविला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विपूल निसर्ग संपदा आहे. मात्र जिल्ह्याला वरुणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांपूढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकºयांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न कोसळल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसासाठी पूजाअर्चनाही केली जात आहे. जिल्ह्यातील काही गावांत दोन ते तीन दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना काही प्रमाणात का, होईना संजीवनी मिळाला.निसर्गाने सोडली साथऐन खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीची बिकट अवस्था झाली आहे. पिकांना पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने पिके कोमेजून गेली. निसर्गानेही शेतकºयांची साथ सोडल्याने पिके आता जगवायची कशी ? अशी चिंता शेतकºयांना सतावत आहे.नऊ धरणात केवळ १९ टक्के जलसाठाचंद्रपूर: जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. मात्र, दोन महिन्यात केवळ २०० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला. सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने धरणे, तलावांनी तळ गाठला आहे. नऊ धरणांत केवळ १९.६३ टक्केच जलसाठा आहे. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाºया इरई धरणात ३३.१२ टक्के, तर मामा तलावात १०.४१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पाण्यासाठी धावाधाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आसोलामेंढा धरणात (३६.९८ टक्के), घोडाझरी (०.९२), नलेश्वर (२.९१), चंदई (८.५५), चारगाव (२६.५७), अमलनाला (२३.९२), लभानसराड (४८.३५), पकडीगुड्डम (१९.७४), डोंगरगाव (४०.७५), इरई (३३. २२) टक्केच जलसाठा आहे. जिल्ह्यात लघु प्रकल्प ३७, तर मामा तलावांची संख्या ५१ इतकी आहे. यातही फारसा जलसाठा नाही. पावसामुळे धानपट्ट्यात पेरणीची कामे ठप्प पडली आहे. ज्यांनी पेरणी केली. त्यांची पिके आता करपत आहे.जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचासाधारणत: जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस कोसळतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीपच राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाºया पावसामुळे धरणे भरणार की, नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच जिल्ह्यात विदारक चित्र बघायला मिळत आहे.खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अजूनही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाअभावी पिके कोमेजायला लागली आहे. पावसाच्या भरवशावर शेती करणाºया सर्वच शेतकºयांची अवस्था बिकट असून शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.-संबाशिव जुनघरी, शेतकरी, गोवरी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती