शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चारा टंचाईमुळे पशुधनात घट

By admin | Updated: March 16, 2015 00:45 IST

उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे.

कानपा : उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे. शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचत नसल्याने जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.ग्रामीण भागात प्रत्येक घरी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी प्राणी पाळायचे. अनेक मंडळी आपल्या हौसेखातर गाय, बैल, म्हैस पाळायचे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेकांनी सुरू केलेले पशुपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीत आला होता. एका गुराख्याकडे चराईसाठी जाणाऱ्या गुरांची संख्या २०० ते २५० च्या आसपास असायची. या व्यवसायातून गुराख्याला रोजगार मिळायचा. आजच्यासारखी चारा व पाणी टंचाई पूर्वी नव्हती. हिरवा चारा मुबलक मिळायचा. परंतु हे चित्र आता इतिहास जमा झाले असून पशुधन आता विक्रीस काढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाळीव जनावरे आता कमी दिसून येतात. (वार्ताहर)