शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

चारा टंचाईमुळे पशुधनात घट

By admin | Updated: March 16, 2015 00:45 IST

उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे.

कानपा : उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे. शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचत नसल्याने जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.ग्रामीण भागात प्रत्येक घरी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी प्राणी पाळायचे. अनेक मंडळी आपल्या हौसेखातर गाय, बैल, म्हैस पाळायचे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेकांनी सुरू केलेले पशुपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीत आला होता. एका गुराख्याकडे चराईसाठी जाणाऱ्या गुरांची संख्या २०० ते २५० च्या आसपास असायची. या व्यवसायातून गुराख्याला रोजगार मिळायचा. आजच्यासारखी चारा व पाणी टंचाई पूर्वी नव्हती. हिरवा चारा मुबलक मिळायचा. परंतु हे चित्र आता इतिहास जमा झाले असून पशुधन आता विक्रीस काढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाळीव जनावरे आता कमी दिसून येतात. (वार्ताहर)