शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

आयसीयू विभागातच दक्षतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:50 IST

चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देमनुष्यबळाची वानवा : पायाभूत सुविधाच नाही अन् यंत्र हाताळणारे प्रशिक्षितही नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आरोग्य सेवेशी निगडित यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची कमतरता या दोन गोष्टींचा जिल्हा सामान्य रुग्णालयात अभाव असल्यामुळे त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. येथे अतिदक्षता विभाग असला तरी या विभागासाठी असणाºया पायभूत सुविधाच या ठिकाणी नसल्याची माहिती समोर आली आहे.अतिदक्षता विभागात येणारा प्रत्येक रुग्ण अत्यंत गंभीर असतो. त्याच्यावर या ठिकाणी अतिशय गांभीर्याने उपचार करावा लागतो. त्यासाठी अत्याधुनिक यंत्र आणि ते हाताळणाºया प्रशिक्षित मनुष्यबळ असावा लागतो. मात्र चंद्रपुरातील अतिदक्षता विभागात या दोन्ही गोष्टीची वानवा आहे. अतिदक्षता विभागात मुबलक आॅक्सीजन सिलिंडर हवे, बॉयोपॅप, सीपॅप, व्हेंटीलेटर हवे, डोप्यामीन, नॉर अ‍ॅड्रानॅलीन आणि ते देण्यासाठी मायक्रोड्रीप युनीट हवे. मात्र येथील सामान्य रुग्णालयात यातील अनेक गोष्टी नाही. व्हेंटीलेटर अलिकडेच खरेदी केले आहे, मात्र ते हाताळणारा प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाभरातून वा गडचिरोली जिल्ह्यातून दररोज सुमारे साडेतीनशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जातात. सहाजिकच ते गंभीर रुग्ण असतात. मात्र येथील आयसीयूमध्ये केवळ सहाच रुग्णांना ठेवता येते. तेवढीच उपलब्धता येथे आहे. मात्र दररोज येथे येणाºया १५ ते २० रुग्णांना आयसीयूची गरज भासते. येथील कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांना इच्छा व रुग्णाची गरज असूनही सर्व रुग्णांना आयसीयूमध्ये ट्रीटमेंट देता येत नाही. यामुळे स्वाभाविकच रुग्णांची हेळसांड होते. या भानगडीत काही रुग्ण दगावतात देखील.मेडीकल कॉलेज झाले; मात्र रुग्णालय तसेचचंद्रपूरला शासकीय मेडीकल कॉलेज आले. याला आता तीन वर्षांचा कालावधी होत आहे. मेडीकल कॉलेज अस्तित्वात असताना प्रत्येक गंभीर रुग्णावर चंद्रपुरातच उपचार होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातून वा एखाद्या खासगी इस्पीतळातून ‘रेफर टू नागपूर’ चा प्रकार सुरूच आहे. मेडीकल कॉलेज आहे, जिल्हा रुग्णालय आहे, शहरात अनेक ठिकाणी जागाही उपलब्ध आहे. तरीही रुग्णालयाची स्थिती आणि तेथील सुविधा अत्याधुनिक झालेल्या नाही. कधी आजाराशी निगडित यंत्र उपलब्ध नसते. यंत्र असेल तर ते देखभालीअभावी नादुरुस्त असते तर कधी यंत्र हाताळणारे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नसतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील अतिदक्षता विभागात रुग्णांसाठी जागाही नसते. या सर्व प्रकारामुळे डॉक्टरांना नाईलाजाने रुग्णांना ‘रेफर टू नागपूर’ करावे लागते.डॉक्टरांचाही नाईलाजजिल्हा सामान्य रुग्णालयात रुजू होऊन रुग्णांना मनोभावे सेवा देऊ इच्छीणारे अनेक डॉक्टरही येथे कार्यरत आहेत. अनेकवेळा हे डॉक्टर राऊंडवर असताना रुग्णांना भेटतात. त्यावेळी जमिनीवर चादर टाकून उपचार घेत असलेला रुग्ण बघून त्यांच्याही डोळ्यात अश्रूू तरळते. परंतु डॉक्टर असल्याने संवेदनशिलता बाजूला सारून त्यांना आहे त्या स्थितीत उपचार करावा लागतो. हा सर्व प्रकार सुविधांच्या अभावामुळेच होत आहे.