शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशी शिक्षक करतात मजुरी

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली

जिवती : गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सुटीच्या दिवशी फावल्या वेळात मजुरीला जावे लागत आहे.शाळेची नियमित नोकरी करून वेळ मिळेल तेव्हा किंवा सुटीच्या दिवशी हे शिक्षक शेतीचे काम इतरांकडे मजुरी करतात. एवढेच नव्हे तर काही शिक्षक हॉटेलातसुद्धा काम करीत आहेत. विनाअनुदानीत शाळांवर काम करता करता अनेक शिक्षकांचे वय निवृत्तीच्या जवळ आले आहे. अनेक शिक्षकांनी चाळीशी ओलांडली असताना संसाराचा गाडा पुढे कसा रेटावा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पगारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापर्यंत पगार झाले नाही तर आंदोलने केली जातात. मग चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांनी कुणाकडे न्यायासाठी हात पसरावे? हा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे.एखादा कर्मचारी आजारी पडला किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर दवाखान्यात उपचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. अशावेळी त्यांनी काय करावे? कामाचा मोबदला हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, पण या शिक्षकांच्या बाबतीत असे घडत नाही. शासन प्रत्येकवेळी या शिक्षकांच्या पदरी आश्वासनाची खैरात टाकते. पण देत काहीच नाही.आजच्या स्थितीत विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षक २० हजारांच्या वरून आहेत. पण त्यांच्या पोटाचा प्रश्न अजुनही सुटला नाही.आज हे कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा एकत्र येतात. हिवाळी अधिवेशनात शासन सकारात्मक भूमिका घेईल का? या प्रश्नावर चर्चा करतात. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुदानाविषयी सकारात्मक भूमिका घेऊन समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे.पूर्वी शिक्षक होण्यासाठी बेरोजगारांमध्ये स्पर्धा होती. तेव्हा शिक्षकांच्या जागाही मोठ्या प्रमाणावर भरल्या जायच्या. त्यातील काही बेरोजगार जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्यांना जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली नाही, त्यांनी स्वत: लाखो रुपये डोनेशन देऊन खासगी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र १४ वर्षांचा ‘वनवास’ भोगूनही अद्याप त्यांच्या नशिबी फरफटच आली आहे. (शहर प्रतिनिधी)