शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

सुटीच्या दिवशी शिक्षक करतात मजुरी

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली

जिवती : गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सुटीच्या दिवशी फावल्या वेळात मजुरीला जावे लागत आहे.शाळेची नियमित नोकरी करून वेळ मिळेल तेव्हा किंवा सुटीच्या दिवशी हे शिक्षक शेतीचे काम इतरांकडे मजुरी करतात. एवढेच नव्हे तर काही शिक्षक हॉटेलातसुद्धा काम करीत आहेत. विनाअनुदानीत शाळांवर काम करता करता अनेक शिक्षकांचे वय निवृत्तीच्या जवळ आले आहे. अनेक शिक्षकांनी चाळीशी ओलांडली असताना संसाराचा गाडा पुढे कसा रेटावा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पगारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापर्यंत पगार झाले नाही तर आंदोलने केली जातात. मग चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांनी कुणाकडे न्यायासाठी हात पसरावे? हा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे.एखादा कर्मचारी आजारी पडला किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर दवाखान्यात उपचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. अशावेळी त्यांनी काय करावे? कामाचा मोबदला हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, पण या शिक्षकांच्या बाबतीत असे घडत नाही. शासन प्रत्येकवेळी या शिक्षकांच्या पदरी आश्वासनाची खैरात टाकते. पण देत काहीच नाही.आजच्या स्थितीत विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षक २० हजारांच्या वरून आहेत. पण त्यांच्या पोटाचा प्रश्न अजुनही सुटला नाही.आज हे कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा एकत्र येतात. हिवाळी अधिवेशनात शासन सकारात्मक भूमिका घेईल का? या प्रश्नावर चर्चा करतात. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुदानाविषयी सकारात्मक भूमिका घेऊन समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे.पूर्वी शिक्षक होण्यासाठी बेरोजगारांमध्ये स्पर्धा होती. तेव्हा शिक्षकांच्या जागाही मोठ्या प्रमाणावर भरल्या जायच्या. त्यातील काही बेरोजगार जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्यांना जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली नाही, त्यांनी स्वत: लाखो रुपये डोनेशन देऊन खासगी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र १४ वर्षांचा ‘वनवास’ भोगूनही अद्याप त्यांच्या नशिबी फरफटच आली आहे. (शहर प्रतिनिधी)