शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

सुटीच्या दिवशी शिक्षक करतात मजुरी

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली

जिवती : गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सुटीच्या दिवशी फावल्या वेळात मजुरीला जावे लागत आहे.शाळेची नियमित नोकरी करून वेळ मिळेल तेव्हा किंवा सुटीच्या दिवशी हे शिक्षक शेतीचे काम इतरांकडे मजुरी करतात. एवढेच नव्हे तर काही शिक्षक हॉटेलातसुद्धा काम करीत आहेत. विनाअनुदानीत शाळांवर काम करता करता अनेक शिक्षकांचे वय निवृत्तीच्या जवळ आले आहे. अनेक शिक्षकांनी चाळीशी ओलांडली असताना संसाराचा गाडा पुढे कसा रेटावा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पगारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापर्यंत पगार झाले नाही तर आंदोलने केली जातात. मग चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांनी कुणाकडे न्यायासाठी हात पसरावे? हा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे.एखादा कर्मचारी आजारी पडला किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर दवाखान्यात उपचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. अशावेळी त्यांनी काय करावे? कामाचा मोबदला हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, पण या शिक्षकांच्या बाबतीत असे घडत नाही. शासन प्रत्येकवेळी या शिक्षकांच्या पदरी आश्वासनाची खैरात टाकते. पण देत काहीच नाही.आजच्या स्थितीत विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षक २० हजारांच्या वरून आहेत. पण त्यांच्या पोटाचा प्रश्न अजुनही सुटला नाही.आज हे कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा एकत्र येतात. हिवाळी अधिवेशनात शासन सकारात्मक भूमिका घेईल का? या प्रश्नावर चर्चा करतात. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुदानाविषयी सकारात्मक भूमिका घेऊन समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे.पूर्वी शिक्षक होण्यासाठी बेरोजगारांमध्ये स्पर्धा होती. तेव्हा शिक्षकांच्या जागाही मोठ्या प्रमाणावर भरल्या जायच्या. त्यातील काही बेरोजगार जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्यांना जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली नाही, त्यांनी स्वत: लाखो रुपये डोनेशन देऊन खासगी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र १४ वर्षांचा ‘वनवास’ भोगूनही अद्याप त्यांच्या नशिबी फरफटच आली आहे. (शहर प्रतिनिधी)