शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपहाटेपासून शेतकरी मजुरांच्या दारी : शेतकरी मेटाकुटीला, कापूस वेचणीला किलोमागे १० रूपयांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कापूस वेचणीसाठी मजुरांच्या टंचाईने शेतकरी मेटकुटीस आला आहे. पावसामुळे कापसाचे दर कोसळले आहेत. त्यातच आता वेचन्यासाठी मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत.यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कपाशीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चार -पाच दिवसांपासून उन्ह वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र कपाशीचे बोंडे फुटत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक तालुके असलेले कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती तसेच चंद्रपूर, गोंडपिपरी आदी तालुक्यांत कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी अन्य गावावरून मजूर आणून कापसाची वेचणी करीत आहेत. आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे मजुरांना वेचणीवर खर्च करावा लागत आहे. गेल्यावर्षी ५ रूपये किलोप्रमाणे प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांनी दिली होती. यावेळी ती वाढली आहे.अशी करतात सीतदहीशेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झांडामध्ये वाकाचा पाळणा बांधून नव्या कापडात शेतातील पाच दगड पाण्याचे धुवून टाकण्यात येतात. यानंतर त्याची पूजा करण्यात येते.कापूस घरी नेण्यासाठी लगबगदिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेले बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पºहोटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेल्या कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती