शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपहाटेपासून शेतकरी मजुरांच्या दारी : शेतकरी मेटाकुटीला, कापूस वेचणीला किलोमागे १० रूपयांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कापूस वेचणीसाठी मजुरांच्या टंचाईने शेतकरी मेटकुटीस आला आहे. पावसामुळे कापसाचे दर कोसळले आहेत. त्यातच आता वेचन्यासाठी मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत.यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कपाशीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चार -पाच दिवसांपासून उन्ह वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र कपाशीचे बोंडे फुटत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक तालुके असलेले कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती तसेच चंद्रपूर, गोंडपिपरी आदी तालुक्यांत कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी अन्य गावावरून मजूर आणून कापसाची वेचणी करीत आहेत. आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे मजुरांना वेचणीवर खर्च करावा लागत आहे. गेल्यावर्षी ५ रूपये किलोप्रमाणे प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांनी दिली होती. यावेळी ती वाढली आहे.अशी करतात सीतदहीशेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झांडामध्ये वाकाचा पाळणा बांधून नव्या कापडात शेतातील पाच दगड पाण्याचे धुवून टाकण्यात येतात. यानंतर त्याची पूजा करण्यात येते.कापूस घरी नेण्यासाठी लगबगदिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेले बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पºहोटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेल्या कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती