शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीतील फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुर्दशा !

By admin | Updated: August 28, 2015 01:22 IST

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे.

सुरेश रंगारी कोठारीबल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे. गावातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी सामाजिक भवनाची गरज माजी खासदार नरेश पुगलिया यांनी हेरली. त्यांनी खासदार फंडाचा आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून फुले-आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची निर्मीती करून सन २०१४ ला ग्रामस्थांसाठी खुले केले. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविली. मात्र गेल्या दहा वर्षात या भवनाची दयनीय अवस्था झाली आहे. फुले-आंबेडकरांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाने मद्यपी व मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचे विदारक चित्र आहे.आठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भवन कोणी आपला वाली आहे काय, असाच जणू प्रश्न विचारीत उभे आहे. भवनाच्या आवारात सर्वत्र कचरा साचलेला आहे. मोकाट जनावरांचा यात सदैव वावर असतो. आतील भागात भयावह स्थिती आहे. भवनात लावलेले सर्व पंखे चोरट्यांनी लंपास केले आहे. इलेक्ट्रीक वायरिंग अत्यावस्थ असून कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास जिविताला धोका निर्माण होतो. शौचालयाची दयनीय स्थिती असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. भवनात सर्वत्र विदारक परिस्थिती असून त्यात कोणी सभा, कार्यक्रम करण्याचे धाडस करीत नाही. भवनाचा आतील व बाहेरील रंगरंगोटी केलेली नसल्याने भवनाकडे कुणी पाहण्याची हिंमत करीत नाही. भवनाच्या खिडकीच्या काचा पुर्णता फुटलेल्या आहेत. फ्लोरिंगची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. भवनाच्या अवती भवती कचऱ्याचे ढिगारे व रस्त्यावर मोठ्या वाहनांची रात्रंदिवस अतिक्रमण असते. परिणामी भवनात प्रवेश कुठून करावा असा प्रश्न निर्माण होतो.गावातील विविध समारंभ, सभा, बैठका व छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी भवनाचा चांगला उपयोग होवू शकतो. गोरगरिबांच्या लग्न कार्यासाठीही भवन उपयोगात येवू शकते. मात्र त्याच्या देखभालीकडे, व्यवस्थेकडे व स्वच्छतेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याने त्यात कोणतेही कार्यक्रम होणे कठीण आहे. भवनाची रंगरंगोटी, इलेक्ट्रीकची योग्य व्यवस्था, स्वच्छता करून जनतेच्या कल्याणासाठी भवन उपयोगात आणल्या जावे अशी मागणी आहे.