शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

कोंडवाड्यातील जनावरांना ना चारा, ना पाणी !

By admin | Updated: July 1, 2016 01:08 IST

जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले.

ही कसली शिक्षा ?: ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्षकोठारी : जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले. मात्र सदर जनावरांच्या चारा पाण्याची तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यात ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार दिसून आला.१४ बैल व तीन म्हशींना अवैधरित्या खरेदी करुन तस्करी करीत असल्याचा सुगावा ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना लागला. त्यांनी सापळा रचून तस्करांच्या तावडीतून जनावरांना मुक्त केले. तस्करांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. जप्त करण्यात आलेल्या १७ जनावरांना २५ जूनला कोठारी येथील ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकले. ठाणेदारांनी दोन दिवस जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र त्यानंतर ग्रामपंचायतीने जनावरांना चारा रोज देणे बंद केले. ग्रामपंचायतीकडे चारा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चाऱ्याची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोंडवाड्यातील जनावरांची योग्य निगा व त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना व त्याचा मोबदला मिळत असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चारा संपला असेल तर त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जनावरे कोंडवाड्यात टाकल्यापासून त्याची जबाबदारी १७ दिवस ग्राम पंचायतीची असते. त्यानंतर त्यांचे मालक न आल्यास लिलावाद्वारे जनावरे विकण्यात येतात. मात्र बंदिस्त जनावरांच्या चारा, पाणी व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलली पाहिजे. सध्या पावसाळा सुरू असून कोंडवाड्यात चिखल पसरला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. जनावर दगावल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्रश्न आहे.तस्करी करताना जनावरांना मुक्त करुन कोंडवाड्यात टाकण्यात आले. त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. दरम्यान, जनावरांच्या देखभालीचा मोबदला ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. तेव्हा त्यांनीच जबाबदारी स्वीकारावी, असे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सांगितले. (वार्ताहर)