शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

क्षुल्लक कारणांमुळे कोल्हापुरी बंधारे निकामी

By admin | Updated: May 31, 2015 01:56 IST

जलयुक्त शिवार अभियान ही नव्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची कडक आणि जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान ही नव्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची कडक आणि जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच जुन्या बंधाऱ्यांना पुनरुज्जीवित करून लाखोंची उधळपट्टी रोखण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभाग जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत नवीन बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करीत आहे. मात्र हे बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किंमतीच्या लोखंडी प्लेटअभावी निकामी पडले आहेत.विशेष म्हणजे, या विभागाकडे साध्या प्लेट खरेदी करण्यासाठीही निधी नाही. पण नवीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. राजुरा तालुक्यात असाच आणखी एक कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत असून हा बंधारादेखील शोभेची वास्तू ठरण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद सिंचन विभाग राजुरा कार्यालयाने तालुक्यात १०० च्या वर कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल, असा हेतू होता. पण, आजच्या स्थितीत या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरी गेल्या आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही. केवळ लोखंडी प्लेटअभावी हे बंधारे निकामी ठरले आहेत. विहीरगाव, भुरकुंडा, गोवरी, लक्कडकोट, मारडा, सिंधी, पाचगाव यासह इतर गावालगतच्या नाल्यांवर बांधलेले कोल्हापुरी बंधारे शेवटच्या घटका मोजत आहेत. परंतु या बंधाऱ्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अत्यल्प किंमतीच्या प्लेटसाठी पैसा नाही. पण, लाखो रुपयांच्या नवीन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)