शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

जातकारणाच्या बढाया मारणारेच पडले तोंडघशी ..!

By admin | Updated: May 24, 2014 23:30 IST

प्राचीन काळापासून देशात ‘जात’ या शब्दाने समाजाची विभागणी केली आहे, तर देशात जाती व विविध समाजांना आरक्षणाची भेट शासनाकडूनही देण्यात आली. विविध जाती-धर्म-पंथांचा समावेश असलेल्या या देशात

वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरी

प्राचीन काळापासून देशात ‘जात’ या शब्दाने समाजाची विभागणी केली आहे, तर देशात जाती व विविध समाजांना आरक्षणाची भेट शासनाकडूनही देण्यात आली. विविध जाती-धर्म-पंथांचा समावेश असलेल्या या देशात आजवर राजकारणात ‘जातकारण’ करण्यात आल्याचे निवडणूक निकालानंतर मतदारांच्या लक्षात आले. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनुकूल परिस्थितीतील जातकारणावर समाजकारण व राजकारण श्रेष्ठ ठरून जातकारणाच्या बढाया मारणार्‍यांना तोंडघशी पडावे लागल्याचे दिसून आले.‘आप’कडून अँड. वामनराव चटप अशा दिग्गजांनी निवडणूक लढविली. यात काँग्रेस व ‘आप’ उमेदवारांच्या राजकारणात जातकारणाची जोड असल्याने सर्वांनाच त्यांचे पारडे जड वाटत होते, तर अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार असलेल्या अहीर यांची बाजू बरीच कमजोर वाटत होती. मात्र निवडणूक निकालानंतर मतदारांसह राजकीय वतरुळातील नेत्यांवरही निवडणूक निकालानंतर डोके खाजविण्याची वेळ आली. तसेच ज्या क्षेत्रात उमेदवाराला जातकारणाचा अधिक फायदा होण्याचे संकेत असतानाही ‘मोदी लाट’ व सत्ता परिवर्तनाची गरज अशा दुहेरी मार्‍यापुढे जातकारणावर मतदारांनी पांघरून घालून भाजपाला भक्कम असा कौल दिल्याने ‘काळ बदलला आता जातकारणाला थारा नाही’ अशा प्रतिक्रिया सामान्यांच्या वतरुळातून व्यक्त होत आहे.‘गुळ तिथे माशा’ या उक्तीप्रमाणे निवडणुकी पूर्वी जुळलेल्या कार्यकर्त्यांनी जातकारण करणार्‍या उमेदवार व पक्ष पदाधिकार्‍यांना तन-मन-धनाने कार्य करण्याची व छातीला माती लावून उमेदवाराला विजयी करण्याची दिलेली ग्वाही कितपत खरी ठरली, हे मतदार संघातील गावनिहाय मतमोजणीतील प्राप्त मत संख्येवरुनच कळते. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची छाया पडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत असून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बड्या पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या निकालावरुन आत्मचिंतनातून विधानसभा निवडणुकीची रणनिती आखणे गरजेचे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून हंसराज अहीर, काँग्रेसकडून संजय देवतळे व

पक्ष उमेदवारांसोबत केवळ जातकारणातून जुळणार्‍या संधीसाधूंनी निवडणुकीपूर्वी मारलेल्या जातकारणाच्या बढाया चांगल्याच अंगलट आल्या. त्यामुळे त्यांच्यावर चांगलेच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. केवळ स्वार्थ साधण्याच्या हेतूने

बढाईखोर कार्यकर्त्यांना बाजुला सारणे हे तेवढेच गरजेचे असून कार्यकर्त्यांचे राजकीय अस्तित्व व लोकांमधील त्यांची प्रतिष्ठा याची खात्री करूनच त्यावर विश्‍वास ठेवण्याची गरज आता संभाव्य उमेदवारांना आहे.