शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

बिबट्याच्या हल्ल्यात २१ शेळ्या ठार

By admin | Updated: October 12, 2015 01:22 IST

सादागड बिटाअंतर्गत येत असलेल्या खेडी गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून २१ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली.

सावली : सादागड बिटाअंतर्गत येत असलेल्या खेडी गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून २१ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. सावली तालुक्यापासून दोन किमी अंतरावर खेडीगाव आहे. मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून रात्री २१ शेळ्या ठार केल्या. सुखरू बका कंकलवार असे शेळी मालकाचे नाव आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले कंकलवार हे वामन पिकलवार यांच्या गोठ्यात शेळ्या बांधून ठेवत असतात. नेहमीप्रमाणे सकाळी दूध काढण्यासाठी गेले असता सर्व शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.त्याच रात्री १२ वाजता दरम्यान बंडू पोचू मारेवार यांच्या घरी बिबट्याने हल्ला चढविला. परंतु ते जागेच असल्याने बिबट्याने पळ काढला. खेडी व भवराळा लागून आसोलामेंढा कालवा आहे. काही अंतरावर त्याच बाजुला नहराजवळ १०८ जागेवर सुबाभुळचे खासगी वन आहे. हे वन घनदाट असून वन्यप्राण्यांना लपून बसण्याकरिता जागा आहे. दिवसा ढवळ्याही येथून प्रवास करताना बिबट कधी हल्ला चढविल याचा काही नेम नाही. दिवसभर या ठिकाणी बिबट लपून राहत असून रात्री सुमारास गावा शेजारील पाळीव प्राण्यावर हल्ला चढवित असतो. बिबट सारखे हिस्त्र प्राणी गावात येवू लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.या गावात मेंढपाळाची संख्या अधिक आहे. या ठिकाणी कुरमार जातीचे लोक राहतात. त्याचा पारंपरिक व्यवसाय असल्याने बहुतेकांच्या घरी कमीत कमी खंडीभर शेळ्या असतात. या भरोशावरच कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होत असते. घर संसार चालत असतो.कंकलवार यांच्या २१ शेळ्या बिबट्याने ठार केल्यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सकाळी या घटनेची माहिती मिळताच गावातीलच विजय कोरेवार यांनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली.या सर्व शेळ्यांचे शवविच्छेदन डॉ.ए.व्ही. हगवणे व सहकारी पशुवैद्यकीय अधिकारी पी.डी. जुमनाके यांनी केले. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड, क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे सावली, क्षेत्र सहाय्यक आर.जी.कोडापे, व्याहाड, क्षेत्र सहायक बी.पी. रामटेके, पाथरी, क्षेत्र सहायक एस.डी.येल्लेवाड राजोली, तसेच बिटाअंतर्गत येणारे वनरक्षक विश्वास चौधरी व सर्व वनकर्मचारी उपस्थित होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)