शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

पेरलेल्या बियाण्यांचा शेतकऱ्यांनाच ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रार, बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सध्या सगळीकडे शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात मेहनत घेत आहे. असे असले तरी जिवती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या दिवसात पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून हे बियाणे बोगस आहेत. याची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग जिवती यांच्याकडे तक्रार केली आहे.संपूर्ण जिवती तालुका हा अतिदुर्गम असून येथे कोरडवाहू शेती आहे.कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीनचे पीक या तालुक्यात विशेषत: घेतले जाते. शेतीला सिंचनाची कुठलीही सोय नसताना येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करीत असतो.अशाही स्थितीत शेतकऱ्यांना जर बि- बियाणे बोगस मिळत असतील आणि उगवत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐन हंगामात सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा केला आणि तसा अहवाल कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पाठवला आहे. तेथील अधिकारी सोमवारी शेतात पाहणी करायला येणार आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली असून त्यानुसार शेतात जाऊन आम्ही पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरच्या पातळीवर पाठविला आहे. त्यांची चमू येणार असून त्यानुसार चौकशी होणार आहे.- पल्लवी गोडबोले,तालुका कृषी अधिकारी, जिवती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती