शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

पेरलेल्या बियाण्यांचा शेतकऱ्यांनाच ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रार, बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सध्या सगळीकडे शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात मेहनत घेत आहे. असे असले तरी जिवती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या दिवसात पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून हे बियाणे बोगस आहेत. याची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग जिवती यांच्याकडे तक्रार केली आहे.संपूर्ण जिवती तालुका हा अतिदुर्गम असून येथे कोरडवाहू शेती आहे.कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीनचे पीक या तालुक्यात विशेषत: घेतले जाते. शेतीला सिंचनाची कुठलीही सोय नसताना येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करीत असतो.अशाही स्थितीत शेतकऱ्यांना जर बि- बियाणे बोगस मिळत असतील आणि उगवत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐन हंगामात सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा केला आणि तसा अहवाल कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पाठवला आहे. तेथील अधिकारी सोमवारी शेतात पाहणी करायला येणार आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली असून त्यानुसार शेतात जाऊन आम्ही पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरच्या पातळीवर पाठविला आहे. त्यांची चमू येणार असून त्यानुसार चौकशी होणार आहे.- पल्लवी गोडबोले,तालुका कृषी अधिकारी, जिवती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती