शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

खरीप हंगामाचे अनुदान परत जाणार

By admin | Updated: February 25, 2015 01:21 IST

चालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.

प्रवीण खिरटकर वरोराचालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. अनुदानाचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक अद्याप दिले नाही, अशा शेतकऱ्यांचे अनुदान ७ मार्चनंतर परत जाणार आहे. त्यामुळे बँक खाते नसलेले अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.चालू वर्षातील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दुबारा, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच सोयाबीन पिकाने बहुतांश शेतकऱ्यांना धोकाही दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली. त्यानंतर शासनाने प्रति हेक्टर ४५०० रुपये अनुदान जाहीर केले. महसूल विभागामार्फत मागील काही महिन्यापासून अनुदान वाटप सुरू आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महसूल विभागाने बँक खाते अनिवार्य केले आहे.एकाच सातबारावर एका पेक्षा अधिक नावे असल्यास संमतीपत्र, मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आदी दस्ताऐवज अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. बहुतांश तालुक्यासाठी १४ ते २० कोटी पर्यंतचे अनुदान आले असून शेतकऱ्यांची संख्या प्रत्येक तालुक्यात ३० हजारापेक्षा अधिक आहे. महसूल विभागाने अनुदानाबाबत जनजागृती केली. मात्र, आजतागत केवळ ५० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते तलाठ्याकडे सादर केली नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खाते सादर करण्याकरीता शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी खाते क्रमांक सादर केले नाही. त्यामुळे ७ मार्चनंतर अनुदानाची शिल्लक राशी शासनाकडे परत जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)