शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

खरीप हंगामाला निसर्गाचे ग्रहण

By admin | Updated: September 7, 2015 01:09 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे.

पाऊस पुन्हा गायब : भरात आलेली पिके धोक्यातचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे. यामुळे शेतशिवारातील नदी-नाले आटू लागले असून तलावांमध्येही पाण्याची टंचाई आहे. दुसरीकडे धानाच्या रोवण्या झाल्या आहेत. कपाशी व सोयाबीन फळाला आले आहेत. ऐन भरात आलेली ही पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. एकूण यावर्षीच्या खरीप हंगामालाही निसर्गाने ग्रहण लावल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाबाबत प्रारंभापासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, ४ आॅगस्ट आणि ५ आॅगस्टला जिल्ह्यातील सावली वगळता संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. संततधार नसला तरी पावसाची रिपरिप दोन्ही दिवस सुरूच होती. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला. त्यानंतर पुढे आॅगस्ट महिन्यात आणखी काही दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा तालुक्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी धानाच्या रोवण्या आटोपल्या. कोरपना, जिवती, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही पिके रोगांपासून दूर रहावी म्हणून कपाशी व सोयाबीनला खतपाणी घालून ठेवले. सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. सध्या धानाची रोवणी झाली आहे. आता या धानाला रोजच तुरळक पावसाची गरज असते. कपाशी व सोयाबीनचे पिक फळाला आले आहेत. शेतकऱ्यांनी खते टाकली असल्याने ते मातीत मिसळायला पाणी हवे. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. आता तर उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागल्याने नागरिकही त्रस्त होऊ लागले आहे. पिके तर चक्क करपण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याने पाऊस परतीच्या वाटेवर असल्याचे सांगताच शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. एवढा मोठा खर्च करून लागवड केलेली पिके डोळ्यादेखत सुकणार काय, अशी चिंता त्यांना आहे. (शहर प्रतिनिधी)सिंचन प्रकल्पातही अत्यल्प जलसाठायावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातही जलसाठा पाहिजे तसा होऊ शकला नाही. आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत १९.०३ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ५३.४९ टक्के, नलेश्वर प्रकल्पात ५६.५९ टक्के, अमलनाला धरणात ५७.१० टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प एरव्ही पावसाळ्यात तुडुंब असतात. याशिवाय यावर्षी तलाव, नदी, बोड्यांमध्ये पाहिजे तसे पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊसयावर्षी पावसाळ्याला प्रारंभ झाला तेव्हा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ११३५.४०६ मिमी पाऊस बरसतो, अशी प्रशासकीय माहिती आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते ६ सप्टेंबरपर्यंत सरासरी ७८७.७८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता तर पाऊस परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिकांचे हाल होणार आहे, हे निश्चित.