शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाला निसर्गाचे ग्रहण

By admin | Updated: September 7, 2015 01:09 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे.

पाऊस पुन्हा गायब : भरात आलेली पिके धोक्यातचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे. यामुळे शेतशिवारातील नदी-नाले आटू लागले असून तलावांमध्येही पाण्याची टंचाई आहे. दुसरीकडे धानाच्या रोवण्या झाल्या आहेत. कपाशी व सोयाबीन फळाला आले आहेत. ऐन भरात आलेली ही पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. एकूण यावर्षीच्या खरीप हंगामालाही निसर्गाने ग्रहण लावल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाबाबत प्रारंभापासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, ४ आॅगस्ट आणि ५ आॅगस्टला जिल्ह्यातील सावली वगळता संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. संततधार नसला तरी पावसाची रिपरिप दोन्ही दिवस सुरूच होती. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला. त्यानंतर पुढे आॅगस्ट महिन्यात आणखी काही दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा तालुक्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी धानाच्या रोवण्या आटोपल्या. कोरपना, जिवती, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही पिके रोगांपासून दूर रहावी म्हणून कपाशी व सोयाबीनला खतपाणी घालून ठेवले. सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. सध्या धानाची रोवणी झाली आहे. आता या धानाला रोजच तुरळक पावसाची गरज असते. कपाशी व सोयाबीनचे पिक फळाला आले आहेत. शेतकऱ्यांनी खते टाकली असल्याने ते मातीत मिसळायला पाणी हवे. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. आता तर उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागल्याने नागरिकही त्रस्त होऊ लागले आहे. पिके तर चक्क करपण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याने पाऊस परतीच्या वाटेवर असल्याचे सांगताच शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. एवढा मोठा खर्च करून लागवड केलेली पिके डोळ्यादेखत सुकणार काय, अशी चिंता त्यांना आहे. (शहर प्रतिनिधी)सिंचन प्रकल्पातही अत्यल्प जलसाठायावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातही जलसाठा पाहिजे तसा होऊ शकला नाही. आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत १९.०३ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ५३.४९ टक्के, नलेश्वर प्रकल्पात ५६.५९ टक्के, अमलनाला धरणात ५७.१० टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प एरव्ही पावसाळ्यात तुडुंब असतात. याशिवाय यावर्षी तलाव, नदी, बोड्यांमध्ये पाहिजे तसे पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊसयावर्षी पावसाळ्याला प्रारंभ झाला तेव्हा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ११३५.४०६ मिमी पाऊस बरसतो, अशी प्रशासकीय माहिती आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते ६ सप्टेंबरपर्यंत सरासरी ७८७.७८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता तर पाऊस परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिकांचे हाल होणार आहे, हे निश्चित.