शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

खरीप तोंडावर; मात्र कापूस शेतकऱ्यांच्या घरीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : जून महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच लॉकडाऊन असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे. सीसीआयला नोंदणी केलेल्या सात हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ताटकळत बसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सीसीआयचा झोल कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी बहुतांश शेतमाल घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआयला विक्रीसाठी परवानगी दिल्याने व राजुरा येथील केवळ एकाच कापूस जिनिंगवर मोजकीच कापूस खरेदी केल्याने आजही कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राजुरा येथे सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी नाममात्र असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांसमोर पैशांची अडचणराजुरा येथील जिनींंगवर सीसीआयने शासकीय कापूस खरेदी सुरू केली खरी, मात्र सीसीआयच्या अनागोंदी कारभारामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जून महिना सुरू झाला तरी कापूस खरेदी झालेली नाही. शासनाला शेतकऱ्यांचा कापूस घ्यायचा आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीक विकलेच नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. हाती पैसा होता तो लॉकडाऊनच्या काळात खर्च झाला. आता शेतकऱ्यांसमोर पैशाची मोठी अडचण आहे.

खरीप हंगाम करायचा कसा?शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही घरीच असल्याने शेतकऱ्यांना पैशाची अडचण जाणवू लागली आहे. राजुरा येथे एकाच जिनींगवर सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरीच आहे. आता पुढचा खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच जून महिन्यापर्यंत शेतमाल घरीच ठेवण्याची वेळ यंदा आली आहे, अशी खंत गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी