शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरीप तोंडावर; मात्र कापूस शेतकऱ्यांच्या घरीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : जून महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच लॉकडाऊन असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे. सीसीआयला नोंदणी केलेल्या सात हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ताटकळत बसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सीसीआयचा झोल कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी बहुतांश शेतमाल घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआयला विक्रीसाठी परवानगी दिल्याने व राजुरा येथील केवळ एकाच कापूस जिनिंगवर मोजकीच कापूस खरेदी केल्याने आजही कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राजुरा येथे सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी नाममात्र असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांसमोर पैशांची अडचणराजुरा येथील जिनींंगवर सीसीआयने शासकीय कापूस खरेदी सुरू केली खरी, मात्र सीसीआयच्या अनागोंदी कारभारामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जून महिना सुरू झाला तरी कापूस खरेदी झालेली नाही. शासनाला शेतकऱ्यांचा कापूस घ्यायचा आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीक विकलेच नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. हाती पैसा होता तो लॉकडाऊनच्या काळात खर्च झाला. आता शेतकऱ्यांसमोर पैशाची मोठी अडचण आहे.

खरीप हंगाम करायचा कसा?शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही घरीच असल्याने शेतकऱ्यांना पैशाची अडचण जाणवू लागली आहे. राजुरा येथे एकाच जिनींगवर सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरीच आहे. आता पुढचा खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच जून महिन्यापर्यंत शेतमाल घरीच ठेवण्याची वेळ यंदा आली आहे, अशी खंत गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी