शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते.

ठळक मुद्देहंगामासाठी धडपड सुरुच: आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरानाच्या सावटातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकरी पारंपारिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची नांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पुढील हंगामावार सर्व मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागतीच्या कामाला लागले आहे.आधुनिक पद्धतीला पसंतीदिवसेंदिवस शेती करणे कठिण झाले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी,चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. मात्र प्रत्येक शेतकºयांनाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपारिक पद्धतीनेच शेतीची मशानगत करीत आहे.लॉकडाऊन, अवकाळीने कंबरडे मोडलेयावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पिछा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाऊन झाले आणि त्यांना जराशीही हालचाल करता आली नाही. परिणामी पुढील हंगाम कसा करायचा, हा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. दुसरीकडे अनेक शेतकºयांना आपल्याकडील पीकविलेले धान्य तसेच कापूसही विकता आला नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती