शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

खडसंगी गट ग्रामपंचायतीला महिला सरपंचाची एलर्जी

By admin | Updated: March 27, 2015 00:52 IST

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतले. त्यामध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

राजकुमार चुनारकर खडसंगीपंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतले. त्यामध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतीच्या कारभारी महिला झाल्या आणि पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून त्या कारभार चालवित आहेत. मात्र खडसंगी गट ग्रामपंचायतीच्या इतिहासात आजपर्यंत चार महिला सरपंच झाल्या. त्यापैकी तीन महिला सरपंचावर पद गमविण्याची नामुष्की ओढवली. शासन गावाच्या व देशाच्या विकासात महिलांना पुढे करीत असले तरी मात्र खडसंगी गटग्रामपंचायतीला आदिवासी व दलित महिला सरपंचाची ‘एलर्जी’ का, असा प्रश्न खडसंगी गावातील नागरिकांत चर्चीला जात आहे.चिमूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत म्हणून खडसंगी गावाला ओळखले जाते. तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य संख्या आहे. राजकीयदृष्ट्या संवेदननशिल असले तरी गाव पुर्णत: शांतताप्रिय आहे. राजकारणापुरते एकामेकांमध्ये मतभेद ठेवतात. मात्र काही दिवसांत सर्व विसरून एकमेकांशी मैत्रीने वागतात. अनेक जाती धर्माचे लोक असले तरी खडसंगीत आजपर्यंत कुठलीही समाज विघातक घटना घडली नाही. त्यामुळे गावात सर्वधर्म समभाव रूढ झाला आहे.खडसंगी गट ग्रामपंचायतीमध्ये पुरुषाचेच वर्चस्व होते. मात्र ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांची मक्तेदारी संपवत सरपंच बनण्याचा मान अल्पसंख्याक समाजाच्या जे.एस. कुरेशी यांना मिळाला. त्यांनी पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्णदेखील केला. त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली. आदिवासी महिलेसाठी राखीव पद असल्याने मंजुषा सोयाम यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांना पाच वर्षे सत्ता उपभोगता आली नाही. विरोधी गटाने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करून त्यांना पदावरून हटविण्यात ते यशस्वी झालेत. त्यामुळे पाच वर्षे पदावर राहण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. सन २००७ मध्ये अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या पदावर नम्रता वासनिक यांची सरपंच निवड करण्यात आली. त्यांच्यावरसुद्धा त्याच्याच गटाच्या राजकारण्यांनी वेगवेगळे राजकीय आयुध वापरून अपात्र ठरविले. मात्र नम्रता वासनिक यांनी संघर्ष करीत न्यायालयात आव्हान देऊन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.मागील अडीच वर्षाआधी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेल्या आदिवासी महिला सुमन कुंभरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ चांगला गेला. मात्र खडसंगीतील राजकारणी पुरुष मंडळीला हे पचनी पडले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजकीय आयुधांचा वापर करीत सुमन कुंभरे यांच्याविरुद्ध शौचालय असतानाही शौचालय नसल्याची खोटी तक्रार केली. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सुमन कुंभरे यांना अपात्र ठरविले. मात्र महिला सरपंचाने या आदेशाविरूद्ध उपआयुक्त नागपूर यांच्याकडे आव्हान दिल्याने त्यांच्या पदाला काही काळ जीवनदान मिळाले आहे. या प्रकारामुळे तिसऱ्या महिला सरपंचाला न्यायालयात चकरा माराव्या लागणार, हे तेवढेच खरे आहे.खडसंगी ग्रामपंचायतीमध्ये चार महिला सरपंचांपैकी अल्पसंख्याक असलेल्या जे.एम. कुरेशी यांनाच पूर्णकाळ सत्ता भोगता आली. तर आदिवासी महिला मंजुषा सोयाम, अनु. जाती नम्रता वासनिक व विद्यमान सरपंच सुमन अशोक कुंभरे यांनाही अपात्र ठरविले. गेल्या काही वर्षांत खडसंगीत घडलेल्या या प्रकाराने खडसंगी ग्रामपंचायतीला आदिवासी व दलित महिला सरपंचाची एलर्जी तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.