शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

मनपा हद्दीतील आरक्षित भूखंडांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

चंद्रपूर शहरासाठी विकास आराखडा नगर रचना विभागाने तयार केला. महापालिकेने मंजुरीही दिली आहे. आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित आहे. ...

चंद्रपूर शहरासाठी विकास आराखडा नगर रचना विभागाने तयार केला. महापालिकेने मंजुरीही दिली आहे. आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित आहे. नगरविकास आराखड्यानुसार प्रत्येक गोष्टींसाठी भूखंड आरक्षित केले जाते. त्यामध्ये दवाखाना, रस्ते, शाळा, क्रीडांगण, बगिचा आदींचा समावेश असतो. प्रत्येक ले-आऊटमध्ये ले-आऊटच्या क्षेत्राच्या १० टक्के जागा ओपनस्पेस म्हणून आरक्षित ठेवली जाते; मात्र चंद्रपुरातील अनेक ले-आऊटमध्ये अशी आरक्षित जागा गायब करण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच अवस्था क्रीडांगण व बगिच्यांची झाली आहे. चंद्रपुरातील ३३ प्रभागांचे क्षेत्र गृहित धरल्यास या शहरात किती बगिचे व क्रीडांगण असले पाहिजे, हे शहर विकास आराखड्यात नमूद असेल; मात्र शहरात परिस्थिती भिन्न आहे. सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी बगिचे तयार झाले आहेत. शहराचा पसारा बघता या बगिचांची संख्या कमी आहे. मुलांंसाठी क्रीडांगणेही कमी दिसतात. या बाबींसाठी शहर विकास आराखड्यात भूखंड आरक्षित आहेत. नगरपालिका अस्तित्वात असतानापासून याकडे लक्ष दिले नाही. कुठल्याच वापरात नसलेले हे भूखंड नागरिकांनी हळूहळू आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. या आरक्षित भूखंडांची सध्या वाट लागली आहे. महानगरपालिकेने व नगर रचना विभागाने या आरक्षित भूखंडांची गांभीर्याने चौकशी करणे आता गरजेचे झाले आहे, तरच विविध प्रभाग विकसित होऊ शकणार आहे.

बॉक्स

मनपा करू शकते खासगी जागा आरक्षित

नागरिकांना शहरात बांधकामे करताना सार्वजनिक बाबींसाठी काही जागा आरक्षित ठेवावी लागते. ले-आऊटनुसार रस्ते मंजूर असतात. रस्ता नागरिकांच्या मालमत्तेमधून जात असेल तर मालमत्तेतून रस्त्याची जागा मनपा आरक्षित ठेवते. या आरक्षणानंतरच बांधकामाला परवानगी दिली जाते. जागेचा मोबदला मनपाला मालमत्ताधारकांना द्यावा लागतो; परंतु मनपाने अनेक ठिकाणी अशी भूखंडे आरक्षित केली नाही. नागरिकांनी त्यावर बांधकामे केली आहेत.

बॉक्स

भूखंडावर कचऱ्याचे ढिगारे

शहरातील अनेकांनी प्लाट खरेदी करून ठेवले. अनेक वर्षांपासून त्यावर बांधकामे केले नाही. तिथे झाडेझुडुपे व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा कचऱ्यायुक्त भूखंडांमुळे शहर सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.