शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आधुनिक झाडूमुळे केरसुणी हद्दपार

By admin | Updated: January 4, 2015 23:09 IST

जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत असून, विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

चंद्रपूर : जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत असून, विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. सिंदीच्या पानापासून झाडू व्यवसाय करणारे हळूहळू या व्यवसायापासून काढता पाय घेत आहेत. हा व्यवसाय करणारे बहुतांश लोक आदिवासीबहुल भागात राहतात. अशा गावांमध्ये अशा बाजारपेठेचा अभाव असून, बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची सुविधा नाही. दुकानात मिळणाऱ्या आधुनिक झाडूने बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे बहुतांश गावातील हा व्यवसाय बंद झाला आहे. सिंदीच्या पानापासून झाडू बनविण्याचा व्यवसाय पिढ्यान्पिढ्या चालत आला आहे; मात्र सद्यस्थितीत झाडू बनविण्यासाठी सिंदीची झाडेच कमी झाल्यामुळे पाने मिळणे कठीण झाले आहे. हा व्यवसाय करणारे कुशल कारागीर हतबल झाले आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, हा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे.या झाडूंना ग्रामीण भागात थोडीफार मागणी आहे. महाराष्ट्रात सिंदीच्या झाडांची संख्या अत्यल्प असल्याने ही पाने परराज्यातून आणावी लागतात. त्यासाठी वाहतूक खर्च येतो. उत्पादन खर्चातील वाढ, झाडूची कमी मागणी यामुळे हे व्यावसायिक हलाखीच्या स्थितीत जगत आहेत.आधुनिकतेमुळे अनेक देशी-विदेशी उद्योगामुळे पारंपरिक व्यवसाय नष्ट होत असून, यापैकीच एक झाडू व्यवसाय आहे. नवनवीन प्रकारचे झाडू आणि व्हॅक्युम क्लीनर आल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस मोडकळीस आला आहे. या व्यवसायाकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने खेडोपाडी घराघरांतून आढळणारी आणि ‘लक्ष्मी’ म्हणून संबोधली जाणारी केरसुणी इतिहासजमा होते की का, असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागात आजही केरसुणीला मागणी असली तरी केरसुणी घरात आल्यानंतर त्याची हळदी-कुंकूने पूजा करण्याची परंपरा आहे.परंतु, आधुनिकीकरणाकडे वळत असताना पारंपरिक पद्धतीने बनविल्या जात असलेल्या झाडू व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आधुनिक केरसुणी व्हॅक्युम क्लीनर यासारखे साहित्य उपलब्ध झाल्याने व सिंदीची पाने हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे पारंपरिक झाडू व्यवसाय डबघाईस आला असून झाडू बनविणाऱ्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. (प्रतिनिधी)