शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

सैनिकी स्कूलमध्ये अनुभवता येणार कारगिल युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:48 IST

कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले,....

ठळक मुद्देशौर्यगाथेचे चित्रमय बोलके दालन : सहा महिन्यात होणार तयार

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले, याचे सचित्र व बोलके दर्शन लोकांना व्हावे, त्याची सविस्तर माहिती त्यांना कळावी, यासाठी भिवकुंडवरील चंद्रपूर सैनिकी स्कूल येथे १० हजार फुट क्षेत्रफळाचे चित्रमय दालन उभारले जात आहे. आपण प्रत्यक्ष कारगिलच्या रणभूमीत उभे आहोत, असा रोमांचकारी अनुभव या दालनातून मिळणार आहे.पाकिस्तानने सीमारेखेचे उल्लंघन करून, भारताच्या चौक्यांवर कब्जा जमविला होता. त्या चौक्यातून पाकी सैन्यांना हुसकावून त्या परत आपल्या ताब्यात घेण्याकरिता भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावली. उंचवट्यावर शत्रू, खालच्या बाजूने त्यांच्यावर मारा करणे सोपे काम नव्हते. मात्र थलसेना आणि वायूसेना यांनी ते शौर्याने करून दाखविले आणि शत्रूच्या कब्जा असलेल्या संपूर्ण चौक्या २६ जुलै १९९९ ला त्यांच्याकडून परत मिळविल्यात. कारगिल युद्धातील ठळकपणा! म्हणून २६ जुलैला कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहाने देशात साजरा केला जातो. आपल्या सैनिकांच्या शौर्याची ही कथा सैनिकी स्कूलमध्ये लाईव्ह युद्धाने दाखविली जाणार आहे. हवाई हमले, बांब स्फोट, सैनिकांची शत्रूंवर चाल इत्यादी सारे बघत असताना आपण स्वत: कारगिल युद्धभूमीवर उभे आहोत, असा जिवंत अनुभव घेता येणार आहे. याची इमारत उभी झाली असून त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ महिन्यात ते पुर्ण होईल. सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहणार!कारगिल भागात बर्फाचा मोसम सुरू झाल्यावर तेथे राहणे कठीण असल्याने भारत - पाक या दोन्ही बाजूने सैनिक मागे हटतात व ठाणी (चौकी) सोडतात. हा अनौपचारिक नियम होता. आपली ठाणी दक्षिणेस तर त्यांची ठाणे उत्तरेकडे! त्यांच्याकडील बर्फ आपल्यापेक्षा पंधरवड्याने वा महिनाभर आधी वितळतो. त्याचा फायदा घेत नियमांचे उल्लंघन करून त्यांनी भारतीय सेनेच्या गैरहजेरीत भारताच्या ठाण्यांवर कब्जा केला. ती ठाणी परत मिळविण्याकरिता हे युद्ध झाले व भारत त्यात यशस्वी ठरले. सैनिकी स्कूलमध्ये २६ जुलैला सकाळी ९ वाजता कारगिल विजय दिन कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या स्कूलचे प्राचार्य नरेश कुमार यांनी दिली आहे.