शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सैनिकी स्कूलमध्ये अनुभवता येणार कारगिल युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:48 IST

कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले,....

ठळक मुद्देशौर्यगाथेचे चित्रमय बोलके दालन : सहा महिन्यात होणार तयार

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले, याचे सचित्र व बोलके दर्शन लोकांना व्हावे, त्याची सविस्तर माहिती त्यांना कळावी, यासाठी भिवकुंडवरील चंद्रपूर सैनिकी स्कूल येथे १० हजार फुट क्षेत्रफळाचे चित्रमय दालन उभारले जात आहे. आपण प्रत्यक्ष कारगिलच्या रणभूमीत उभे आहोत, असा रोमांचकारी अनुभव या दालनातून मिळणार आहे.पाकिस्तानने सीमारेखेचे उल्लंघन करून, भारताच्या चौक्यांवर कब्जा जमविला होता. त्या चौक्यातून पाकी सैन्यांना हुसकावून त्या परत आपल्या ताब्यात घेण्याकरिता भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावली. उंचवट्यावर शत्रू, खालच्या बाजूने त्यांच्यावर मारा करणे सोपे काम नव्हते. मात्र थलसेना आणि वायूसेना यांनी ते शौर्याने करून दाखविले आणि शत्रूच्या कब्जा असलेल्या संपूर्ण चौक्या २६ जुलै १९९९ ला त्यांच्याकडून परत मिळविल्यात. कारगिल युद्धातील ठळकपणा! म्हणून २६ जुलैला कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहाने देशात साजरा केला जातो. आपल्या सैनिकांच्या शौर्याची ही कथा सैनिकी स्कूलमध्ये लाईव्ह युद्धाने दाखविली जाणार आहे. हवाई हमले, बांब स्फोट, सैनिकांची शत्रूंवर चाल इत्यादी सारे बघत असताना आपण स्वत: कारगिल युद्धभूमीवर उभे आहोत, असा जिवंत अनुभव घेता येणार आहे. याची इमारत उभी झाली असून त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ महिन्यात ते पुर्ण होईल. सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहणार!कारगिल भागात बर्फाचा मोसम सुरू झाल्यावर तेथे राहणे कठीण असल्याने भारत - पाक या दोन्ही बाजूने सैनिक मागे हटतात व ठाणी (चौकी) सोडतात. हा अनौपचारिक नियम होता. आपली ठाणी दक्षिणेस तर त्यांची ठाणे उत्तरेकडे! त्यांच्याकडील बर्फ आपल्यापेक्षा पंधरवड्याने वा महिनाभर आधी वितळतो. त्याचा फायदा घेत नियमांचे उल्लंघन करून त्यांनी भारतीय सेनेच्या गैरहजेरीत भारताच्या ठाण्यांवर कब्जा केला. ती ठाणी परत मिळविण्याकरिता हे युद्ध झाले व भारत त्यात यशस्वी ठरले. सैनिकी स्कूलमध्ये २६ जुलैला सकाळी ९ वाजता कारगिल विजय दिन कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या स्कूलचे प्राचार्य नरेश कुमार यांनी दिली आहे.