शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर ‘मर’ रोग

By admin | Updated: July 24, 2014 23:46 IST

पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते.

शेतकरी चिंतेत : हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना फटकाप्रविण खिरटकर - वरोरापावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते. मात्र मागील तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. यादरम्यान सुर्याचे दर्शन नसल्याने आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कमी खर्चात रोखीचे पीक मानल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाकरिता शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. त्यामध्ये उगवन क्षमता कमी असल्याने शेती पडणार, या भीतीने लागवडी व मशागतीचा खर्च अधिक असतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणणात कपाशीची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या व्यर्थ गेल्या. त्यानंतर पाऊस आला. त्यात शेतकऱ्यांनी दुबार तर काहिंनी तिबार पेरणी केली. त्यामुळे कपाशीचे पीक कोवळे असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामध्ये कपाशीच्या पिकाचे मूळ कमजोर होते. अन्न द्रव्य मिळत नाही. त्यामुळे रोपाची वाढ होत नाही व झाड कोलमडून जाते. ज्या कपाशीच्या झाडाला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला ते झाड मरत असते.शेगाव परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्याच्या शेतात मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच कपाशीचे पीक हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कपाशीचे उत्पादन मागील काही वर्षांपासून बऱ्यापैकी होत आहे. परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दर मिळत नाही. परंतु यावर्षी तरी उत्पादन खर्च पेक्षा अधिक दर मिळेल या आशेत शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आता कपाशीवर मर रोगाने प्रादूर्भाव करणे सुरू केल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे दिसून येते. मागील वर्षीही अतिवृष्टी होऊन वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आताही तसेच होत आहे.