शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

चंद्रपूर जिल्ह्यातील कुनाडा कोळसा उत्पादन सहा महिने ठप्प राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:35 IST

माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देवेकोलिला जबर फटकाधनसार कंपनी काळ्या यादीत जाण्याची शक्यता

राजेश भोजेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.वेकोलिच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. धनसार इंजिनिअरींग प्रायव्हेट कंपनीने नियमबाह्यपणे कोळसा उत्पादन केल्याचे सुरूवातीपासूनच वेकोलि अधिकारी सांगत आहे. यावर आता विशेष चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या अहवालाच्या आधारे आरोप निश्चित करून सदर कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शक्यताही वेकोलिच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.कुनाडा कोळसा खाणीत अपघात झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत काम बंद ठेवण्यात आले आहे. अपघाताची भीषणता विचारात घेता पुढील सहा महिन्यांपर्यंत या कोळसा खाणीतून कोळश्याचे उत्पादन सुरू करणे शक्य नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सेंट्रल माईन प्लॅनिंग अ‍ॅन्ड डिझाईन आॅथोरेटी आॅफ इंडियाकडून (सीएमपीडीआय) रितसर मंजुरी घेऊन त्यांनी आखून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच काम करावे लागते. मात्र धनसार कंपनीने कोळसा उत्पादनाच्या हव्यासापोटी हे सर्व मापदंड बाजुला ठेवल्याची बाब चौकशीत पुढे असल्याचेही समजते.वेकोलि अधिकाऱ्यांनाही होती तडा गेल्याची माहितीमातीच्या ढिगाऱ्याच्या चारही बेंचला तडा गेल्याची माहिती कामगारांनी धनसार कंपनीसह वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेली होती. परंतु उत्पादन ठप्प होऊ नये म्हणून कामगारांचा जीव धोक्यात घालून कोळशा उत्खनन सुरू ठेवले होते. वेकोलि अधिकारीही काहीच माहिती नसल्याचे भासवत होते, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. घटनेनंतर येथे भेटी देणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व राजकीय मंडळींपासूनही ही माहिती दडवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.कामगारांना गप्प राहण्याची धमकीया घटनेनंतर वकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आहे. घटनेमागील सत्यता पुढे येऊ नये, यासाठी कंत्राटदार कंपनीकडून पूर्णत: काळजी घेतली जात आहे. कामगारांना याबाबत काही बाहेरची मंडळी धमकावत असल्याची कुजबुज सुरू आहे.ही घटना भीषण होती. याचा जबर फटका वेकोलिला बसला आहे. ज्या कंपनीला कोळसा उत्पादनाचे कंत्राट दिले होते. त्या कंपनीने सीएमपीडीआयच्या मापदंडानुसार काम केले वा नाही याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेपासून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. चौकशी अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.- हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार.

टॅग्स :Accidentअपघात