शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

By admin | Updated: March 25, 2017 00:47 IST

कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

४८ गावातील नागरिक रोजगारमुक्त : जनतेच्या रोजगारापेक्षा वाघांच्या संरक्षणावर भरसुरेश रंगारी कोठारीकन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक आदिवासी गोरगरीब कुटूंबावार उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या अभयारण्यास स्थानिकांनी कडवा विरोध दर्शविला आहे.मागील दोन वर्षापासून कन्हारगाव अभयारण्य करण्यासाठी वन्यजीव संघटना शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. ही बाब स्थानिक जनतेला समजली तेव्हापासून या प्रस्तावाला विरोध सुरू झाला. त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चे, आंदोलन व धरणे दिले. स्थानिक क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, आ. नाना श्यामकुळे, आ. शोभाताई फडणवीस, माजी आ. सुदर्शन निमकर यांनी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यात येवू नये, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच गोंडपिपरी, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील ४८ गावाचे सरपंच, उपसरपंच, जि.प. सदस्य, पं.स. सदस्यांनी अभयारण्याला विरोध करण्यासाठी शासनाकडे ग्रा.पं. ठराव आमसभेचा ठराव, निवेदने पाठविली. मात्र शासनाने स्थानिक ग्रा.पं.च्या ठरावाला केराची टोपली दाखून वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यासाठी तत्परता दाखवित आहे.कन्हारगाव क्षेत्र महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे मध्य चांदा प्रभाग बल्हारशाहाच्या ताब्यात आहे. या क्षेत्रासह झरण, तोहोगाव व धाबा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामावर गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूरसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच हजार मजूर धान शेतीनंतर काम करतात. या क्षेत्रातील कामातून आदिवासी व इतरांना सतत आठ महिने रोजगार उपलब्ध होतो. या रोजगारामुळेच कुटूंबाचे उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या जटील समस्याचे निराकरण होते. कन्हारगाव अभयारण्यामुळे ४७ गावे बाधित होवून हजारो कुटुंबाच्या रोजगाराची व उदरनिर्वाची समस्या गंभीर होणार आहे. स्थानिकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्रस्त शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कामे त्याचा मोठा आधार असून तेच हिरावले गेल्यास विविध समस्या उत्पन्न होवून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ४२ गावांना या अभयारण्याचा फटका बसून गावागावात संसार थाटणाऱ्या गावकऱ्यांना निर्वासिताचे जीवन जगावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे. वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे षडयंत्रसध्या कन्हारगाव वनक्षेत्रात वाघाचे व इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण व संगोपन उत्तमरित्या अभयारण्य घोषित न करतासुद्धा करीत आहे. या क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याही शिकारीच्या घटना घडलेल्या नसताना केवळ वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. रोजगारासाठी करावेलागणार पलायनकन्हारगाव अभयारण्य घोषित होण्याचे स्थानिक गावकऱ्यांना सजले असून त्यांच्यात भिती निर्माण झाली आहे. आता रोजगारासाठी परप्रांतात पलयान करण्याची वेळ आली असून शासन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचे षडयंत्र करीत असल्याचा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.