शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

By admin | Updated: March 25, 2017 00:47 IST

कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

४८ गावातील नागरिक रोजगारमुक्त : जनतेच्या रोजगारापेक्षा वाघांच्या संरक्षणावर भरसुरेश रंगारी कोठारीकन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक आदिवासी गोरगरीब कुटूंबावार उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या अभयारण्यास स्थानिकांनी कडवा विरोध दर्शविला आहे.मागील दोन वर्षापासून कन्हारगाव अभयारण्य करण्यासाठी वन्यजीव संघटना शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. ही बाब स्थानिक जनतेला समजली तेव्हापासून या प्रस्तावाला विरोध सुरू झाला. त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चे, आंदोलन व धरणे दिले. स्थानिक क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, आ. नाना श्यामकुळे, आ. शोभाताई फडणवीस, माजी आ. सुदर्शन निमकर यांनी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यात येवू नये, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच गोंडपिपरी, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील ४८ गावाचे सरपंच, उपसरपंच, जि.प. सदस्य, पं.स. सदस्यांनी अभयारण्याला विरोध करण्यासाठी शासनाकडे ग्रा.पं. ठराव आमसभेचा ठराव, निवेदने पाठविली. मात्र शासनाने स्थानिक ग्रा.पं.च्या ठरावाला केराची टोपली दाखून वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यासाठी तत्परता दाखवित आहे.कन्हारगाव क्षेत्र महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे मध्य चांदा प्रभाग बल्हारशाहाच्या ताब्यात आहे. या क्षेत्रासह झरण, तोहोगाव व धाबा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामावर गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूरसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच हजार मजूर धान शेतीनंतर काम करतात. या क्षेत्रातील कामातून आदिवासी व इतरांना सतत आठ महिने रोजगार उपलब्ध होतो. या रोजगारामुळेच कुटूंबाचे उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या जटील समस्याचे निराकरण होते. कन्हारगाव अभयारण्यामुळे ४७ गावे बाधित होवून हजारो कुटुंबाच्या रोजगाराची व उदरनिर्वाची समस्या गंभीर होणार आहे. स्थानिकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्रस्त शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कामे त्याचा मोठा आधार असून तेच हिरावले गेल्यास विविध समस्या उत्पन्न होवून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ४२ गावांना या अभयारण्याचा फटका बसून गावागावात संसार थाटणाऱ्या गावकऱ्यांना निर्वासिताचे जीवन जगावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे. वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे षडयंत्रसध्या कन्हारगाव वनक्षेत्रात वाघाचे व इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण व संगोपन उत्तमरित्या अभयारण्य घोषित न करतासुद्धा करीत आहे. या क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याही शिकारीच्या घटना घडलेल्या नसताना केवळ वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. रोजगारासाठी करावेलागणार पलायनकन्हारगाव अभयारण्य घोषित होण्याचे स्थानिक गावकऱ्यांना सजले असून त्यांच्यात भिती निर्माण झाली आहे. आता रोजगारासाठी परप्रांतात पलयान करण्याची वेळ आली असून शासन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचे षडयंत्र करीत असल्याचा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.