शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

कन्हाळगाव अभयारण्यमुळे वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, ...

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, असा दावा पयार्वरणवाद्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याला सूरवातीपासूनच काही गावांचा विरोध होता. अभयारण्य घोषित झाल्याने पारंपरिक वन हक्कांवर गदा आणू नका, अशी मागणी करू लागले आहेत.

तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर ,ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत. राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता मिळाली होती. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले होते. अभयारण्यासाठी त्यावेळी २१० चौरस किलोमिटर क्षेत्र निश्चित केले होते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मध्यचांदा वनविभाग व वन प्रकल्पाला ताडोबा प्रमाणेच महत्त्व आहे. कन्हाळगाव अभयारण्यात पर्यटकांचा ओघ वाढू रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले होऊ शकते, असे वन विभागाकडून सांगितले जात आहे.

नागरिकांचा सूरवातीपासूनच विरोध...

कन्हाळगाव अभयारण्याला नागरिकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यात काही राजकीय नेत्यांनी अभयारण्याचा विषयाला हात घातल्याने विरोध अधिक तीव्र झाला होता. अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी १८ ग्रामपंचायती व गट ग्रामपंचाय अंगर्तत ३३ गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. यात नागरिकांनी विरोधात मते मांडली होती.

अशा आहेत गावक-यांच्या मागण्या...

प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, निस्तार हक्कांची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी.