शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

कन्हाळगाव अभयारण्यमुळे वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, ...

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, असा दावा पयार्वरणवाद्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याला सूरवातीपासूनच काही गावांचा विरोध होता. अभयारण्य घोषित झाल्याने पारंपरिक वन हक्कांवर गदा आणू नका, अशी मागणी करू लागले आहेत.

तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर ,ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत. राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता मिळाली होती. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले होते. अभयारण्यासाठी त्यावेळी २१० चौरस किलोमिटर क्षेत्र निश्चित केले होते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मध्यचांदा वनविभाग व वन प्रकल्पाला ताडोबा प्रमाणेच महत्त्व आहे. कन्हाळगाव अभयारण्यात पर्यटकांचा ओघ वाढू रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले होऊ शकते, असे वन विभागाकडून सांगितले जात आहे.

नागरिकांचा सूरवातीपासूनच विरोध...

कन्हाळगाव अभयारण्याला नागरिकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यात काही राजकीय नेत्यांनी अभयारण्याचा विषयाला हात घातल्याने विरोध अधिक तीव्र झाला होता. अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी १८ ग्रामपंचायती व गट ग्रामपंचाय अंगर्तत ३३ गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. यात नागरिकांनी विरोधात मते मांडली होती.

अशा आहेत गावक-यांच्या मागण्या...

प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, निस्तार हक्कांची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी.