शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

By admin | Updated: May 25, 2015 01:39 IST

कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे.

बल्लारपूर: कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे. या भागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रवाशी मंडळींनी प्रत्येक वेळच्या रेल्वेमंत्री तदवतच संबंधित रेल्वच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहेत. या मागणीत पुणेकरिता या मार्गाने गाडी सुरू करणे कसे आवश्यक आहे, हे मुद्देही अनेकवार संबंधितांपुढे मांडले आहेत, परंतु त्यावर प्रत्येक मंत्र्यांनी या संदर्भात तपास सुरू आहे, असेच उत्तर पाठविले आहे. या प्रकारे जनतेच्या या आवश्यक मागणीकडे आजवर सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तसेच सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद, करीमनगर, वरंगल या जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षण घेतात. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील एज्युकेशन हब म्हणून पुण्याची प्रसिद्धी देशभरात आहे. तदवतच, औद्योगिक शहर म्हणून या शहराने आपली ओळख निर्माण केली आहे. या कारणाने, पुण्याला जाण्या-येण्याचे काम वरील सहाही जिल्ह्यातील लोकांना येते. या भागातील विद्यार्थी व इतरांना पुण्याला जाण्याकरिता नागपूर अथवा वर्धा येथे जाऊन तेथून पुण्याकरिता गाडी पकडावी लागते. यात गाडीची वाट बघत राहण्यात वेळ खर्च होतोच, शारिरीक व मानसिक त्रासही होतो. हा त्रास या भागातील विद्यार्थी व जनतेला अनेक वर्षांपासून सोसावा लागत आहे. हा त्रास दूर व्हावा, याकरिता या भागातून म्हणजे कांजीपेठपासून बल्लारपूर, वर्धा या मार्गाने जाणारी पुणे गाडी सुरू केल्यास लोकांची पुण्याला जाण्याला चांगली सोय होईल आणि रेल्वेला तिकीटातून चांगला महसूलही मिळू शकतो. प्रायोगिक तत्वावर निदान अशी साप्ताहिक गाडी सुरू करता येते. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आंध्रप्रदेशचे माजी खासदार पूनम प्रभाकर (करीमनगर), रमेश राठौड (आदिलाबाद) इत्यादींनी ही मागणी वेळोवेळी उचलून धरली. पण, या संदर्भात याबाबत तपास केला जात आहे, असेच उत्तर संबंधितांकडून लोकप्रतिनिधींना नेहमी दिले जात आहे. दहा पंधरा वर्षापासून हेच सुरू आहे. २००७ ला रेल्वेच्या वरिष्ठांनी या मागणी संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशी मंडळाने ही मागणी उचलून धरली. मात्र पुढे त्यात काहीच प्रगती झाली नाही. चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या संघाने परत एक निवेदन नुकतेच दिले आहे. चंद्रपूर-गडचिरोली हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या भागातील ग्रामीण व शहरी भागाचा या ना त्या कारणाने पुण्याशी संबंध येतो. आदिवासींच्या विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मग, या भागाच्या प्रवाशांच्या सुविधेकरिता आणि अत्यंत आवश्यक असलेल्या कांजीपेठ- बल्लारपूर पुणे गाडी सुरू करावी, या मागणीकडे दुर्लक्ष करुन या भागातील लोकांची उपेक्षा केली जात आहे. ती होऊ नये याकडे प्रवाशी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी या निवेदनातून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.सुरेश प्रभु हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांना या भागातील लोकांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यामुळे ते मागणीकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी आशा ‘लोकमत’शी बोलताना सुंचूवार यांनी व्यक्त केली. याबाबत या भागातील युवकांना रेल्वेकडून ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)