शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

By admin | Updated: May 25, 2015 01:39 IST

कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे.

बल्लारपूर: कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे. या भागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रवाशी मंडळींनी प्रत्येक वेळच्या रेल्वेमंत्री तदवतच संबंधित रेल्वच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहेत. या मागणीत पुणेकरिता या मार्गाने गाडी सुरू करणे कसे आवश्यक आहे, हे मुद्देही अनेकवार संबंधितांपुढे मांडले आहेत, परंतु त्यावर प्रत्येक मंत्र्यांनी या संदर्भात तपास सुरू आहे, असेच उत्तर पाठविले आहे. या प्रकारे जनतेच्या या आवश्यक मागणीकडे आजवर सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तसेच सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद, करीमनगर, वरंगल या जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षण घेतात. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील एज्युकेशन हब म्हणून पुण्याची प्रसिद्धी देशभरात आहे. तदवतच, औद्योगिक शहर म्हणून या शहराने आपली ओळख निर्माण केली आहे. या कारणाने, पुण्याला जाण्या-येण्याचे काम वरील सहाही जिल्ह्यातील लोकांना येते. या भागातील विद्यार्थी व इतरांना पुण्याला जाण्याकरिता नागपूर अथवा वर्धा येथे जाऊन तेथून पुण्याकरिता गाडी पकडावी लागते. यात गाडीची वाट बघत राहण्यात वेळ खर्च होतोच, शारिरीक व मानसिक त्रासही होतो. हा त्रास या भागातील विद्यार्थी व जनतेला अनेक वर्षांपासून सोसावा लागत आहे. हा त्रास दूर व्हावा, याकरिता या भागातून म्हणजे कांजीपेठपासून बल्लारपूर, वर्धा या मार्गाने जाणारी पुणे गाडी सुरू केल्यास लोकांची पुण्याला जाण्याला चांगली सोय होईल आणि रेल्वेला तिकीटातून चांगला महसूलही मिळू शकतो. प्रायोगिक तत्वावर निदान अशी साप्ताहिक गाडी सुरू करता येते. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आंध्रप्रदेशचे माजी खासदार पूनम प्रभाकर (करीमनगर), रमेश राठौड (आदिलाबाद) इत्यादींनी ही मागणी वेळोवेळी उचलून धरली. पण, या संदर्भात याबाबत तपास केला जात आहे, असेच उत्तर संबंधितांकडून लोकप्रतिनिधींना नेहमी दिले जात आहे. दहा पंधरा वर्षापासून हेच सुरू आहे. २००७ ला रेल्वेच्या वरिष्ठांनी या मागणी संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशी मंडळाने ही मागणी उचलून धरली. मात्र पुढे त्यात काहीच प्रगती झाली नाही. चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या संघाने परत एक निवेदन नुकतेच दिले आहे. चंद्रपूर-गडचिरोली हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या भागातील ग्रामीण व शहरी भागाचा या ना त्या कारणाने पुण्याशी संबंध येतो. आदिवासींच्या विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मग, या भागाच्या प्रवाशांच्या सुविधेकरिता आणि अत्यंत आवश्यक असलेल्या कांजीपेठ- बल्लारपूर पुणे गाडी सुरू करावी, या मागणीकडे दुर्लक्ष करुन या भागातील लोकांची उपेक्षा केली जात आहे. ती होऊ नये याकडे प्रवाशी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी या निवेदनातून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.सुरेश प्रभु हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांना या भागातील लोकांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यामुळे ते मागणीकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी आशा ‘लोकमत’शी बोलताना सुंचूवार यांनी व्यक्त केली. याबाबत या भागातील युवकांना रेल्वेकडून ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)