शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:42 IST

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मिळेना पाणी : बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, या पाणी विक्रीचा कुठलाही रेकॉर्ड मनपाकडे सादर केला जात नाही. पावत्याही दिल्या जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या प्रकाराची पुष्टी लोकमतकडे केली आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. या नागरिकांना दररोज पाणी पुरविण्याची जबाबदारी उज्वल कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या इरई धरणात बºयापैकी पाणीसाठा आहे. असे असले तरी चंद्रपूरकरांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. बाबुपेठ बंगाली कॅम्प, हिंग्लाज भवानी वार्ड, अष्टभुजा वार्ड, वडगाव, तुकूम तलाव, सुमित्रा नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, पठाणपुरा, रहमननगर, घुटकाळा, संजय नगर, क्रीष्णा नगर वॉर्डात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिक वणवण भटकत आहेत, नळ कनेक्शन असतानाही पाणी मिळत नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून बांधकामधारकांना, बांधकाम कंत्राटदारांना पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, पाणी विकून पैसे घेताना पावतीही दिली जात नसल्याची माहिती आहे. एकूणच हा पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि कंत्राटदारांना पाणी विकणे, असा गोरखधंदा ऐन टंचाईच्या काळात सुरु आहे.लग्नासाठी ५०० तर इतर कामांसाठी हजार रुपये दरकाही वार्डातील नागरिकांना मनपाकडून नि:शुल्क पाणी दिले जात असले तरी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमासाठी मनपाकडून पैशाने पाण्याचे टँकर पुरविले जातात. त्याच्या रितसर पावत्या देऊन मनपाकडे रेकॉर्ड ठेवला जातो. लग्न सोहठ्यासाठी ५०० तर इतर कार्यक्रमासाठी हजार रुपये मोजावे लागत आहे.जीपीएस यंत्रणा नाहीपाण्याचे टँकर दिवसभर कुठे जातात, कुठे पाणी पुरविले जाते, याबाबतची माहिती असावी म्हणून टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाते. मात्र मनपाच्या सहाही टँकरमध्ये ही यंत्रणा ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली नाही. याबाबत अग्निशमन विभागातील अधिकाºयाला विचारले असता, आम्ही स्वत:च टँकरसोबत असतो. त्यामुळे आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणून जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे सांगितले.मनपाकडून दररोज ५० टँकर फेऱ्यामहानगरपालिकेकडे एकूण सहा टँकर आहे. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई असल्याने हे सहाही टँकर विविध वार्डात नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे. जिथे पाण्याची मागणी असेल तिथे टँकर पाठविला जात आहे. दररोज सहा टँकरच्या सुमारे ५० फेºया मारल्या जात आहे. मनापाकडून हे पाणी नि:शुल्क दिले जात आहे.