शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:42 IST

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मिळेना पाणी : बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, या पाणी विक्रीचा कुठलाही रेकॉर्ड मनपाकडे सादर केला जात नाही. पावत्याही दिल्या जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या प्रकाराची पुष्टी लोकमतकडे केली आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. या नागरिकांना दररोज पाणी पुरविण्याची जबाबदारी उज्वल कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या इरई धरणात बºयापैकी पाणीसाठा आहे. असे असले तरी चंद्रपूरकरांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. बाबुपेठ बंगाली कॅम्प, हिंग्लाज भवानी वार्ड, अष्टभुजा वार्ड, वडगाव, तुकूम तलाव, सुमित्रा नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, पठाणपुरा, रहमननगर, घुटकाळा, संजय नगर, क्रीष्णा नगर वॉर्डात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिक वणवण भटकत आहेत, नळ कनेक्शन असतानाही पाणी मिळत नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून बांधकामधारकांना, बांधकाम कंत्राटदारांना पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, पाणी विकून पैसे घेताना पावतीही दिली जात नसल्याची माहिती आहे. एकूणच हा पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि कंत्राटदारांना पाणी विकणे, असा गोरखधंदा ऐन टंचाईच्या काळात सुरु आहे.लग्नासाठी ५०० तर इतर कामांसाठी हजार रुपये दरकाही वार्डातील नागरिकांना मनपाकडून नि:शुल्क पाणी दिले जात असले तरी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमासाठी मनपाकडून पैशाने पाण्याचे टँकर पुरविले जातात. त्याच्या रितसर पावत्या देऊन मनपाकडे रेकॉर्ड ठेवला जातो. लग्न सोहठ्यासाठी ५०० तर इतर कार्यक्रमासाठी हजार रुपये मोजावे लागत आहे.जीपीएस यंत्रणा नाहीपाण्याचे टँकर दिवसभर कुठे जातात, कुठे पाणी पुरविले जाते, याबाबतची माहिती असावी म्हणून टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाते. मात्र मनपाच्या सहाही टँकरमध्ये ही यंत्रणा ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली नाही. याबाबत अग्निशमन विभागातील अधिकाºयाला विचारले असता, आम्ही स्वत:च टँकरसोबत असतो. त्यामुळे आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणून जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे सांगितले.मनपाकडून दररोज ५० टँकर फेऱ्यामहानगरपालिकेकडे एकूण सहा टँकर आहे. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई असल्याने हे सहाही टँकर विविध वार्डात नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे. जिथे पाण्याची मागणी असेल तिथे टँकर पाठविला जात आहे. दररोज सहा टँकरच्या सुमारे ५० फेºया मारल्या जात आहे. मनापाकडून हे पाणी नि:शुल्क दिले जात आहे.