शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

चंद्रपुरात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:42 IST

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मिळेना पाणी : बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, या पाणी विक्रीचा कुठलाही रेकॉर्ड मनपाकडे सादर केला जात नाही. पावत्याही दिल्या जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या प्रकाराची पुष्टी लोकमतकडे केली आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. या नागरिकांना दररोज पाणी पुरविण्याची जबाबदारी उज्वल कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या इरई धरणात बºयापैकी पाणीसाठा आहे. असे असले तरी चंद्रपूरकरांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. बाबुपेठ बंगाली कॅम्प, हिंग्लाज भवानी वार्ड, अष्टभुजा वार्ड, वडगाव, तुकूम तलाव, सुमित्रा नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, पठाणपुरा, रहमननगर, घुटकाळा, संजय नगर, क्रीष्णा नगर वॉर्डात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिक वणवण भटकत आहेत, नळ कनेक्शन असतानाही पाणी मिळत नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून बांधकामधारकांना, बांधकाम कंत्राटदारांना पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, पाणी विकून पैसे घेताना पावतीही दिली जात नसल्याची माहिती आहे. एकूणच हा पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि कंत्राटदारांना पाणी विकणे, असा गोरखधंदा ऐन टंचाईच्या काळात सुरु आहे.लग्नासाठी ५०० तर इतर कामांसाठी हजार रुपये दरकाही वार्डातील नागरिकांना मनपाकडून नि:शुल्क पाणी दिले जात असले तरी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमासाठी मनपाकडून पैशाने पाण्याचे टँकर पुरविले जातात. त्याच्या रितसर पावत्या देऊन मनपाकडे रेकॉर्ड ठेवला जातो. लग्न सोहठ्यासाठी ५०० तर इतर कार्यक्रमासाठी हजार रुपये मोजावे लागत आहे.जीपीएस यंत्रणा नाहीपाण्याचे टँकर दिवसभर कुठे जातात, कुठे पाणी पुरविले जाते, याबाबतची माहिती असावी म्हणून टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाते. मात्र मनपाच्या सहाही टँकरमध्ये ही यंत्रणा ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली नाही. याबाबत अग्निशमन विभागातील अधिकाºयाला विचारले असता, आम्ही स्वत:च टँकरसोबत असतो. त्यामुळे आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणून जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे सांगितले.मनपाकडून दररोज ५० टँकर फेऱ्यामहानगरपालिकेकडे एकूण सहा टँकर आहे. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई असल्याने हे सहाही टँकर विविध वार्डात नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे. जिथे पाण्याची मागणी असेल तिथे टँकर पाठविला जात आहे. दररोज सहा टँकरच्या सुमारे ५० फेºया मारल्या जात आहे. मनापाकडून हे पाणी नि:शुल्क दिले जात आहे.