शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:34 IST

जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांच्या समस्या दूर : हंसराज अहीर यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून त्यामुळे प्रवाशांची समस्या लवकरच दूर होणार आहे.चंद्रपूर स्थानकावर अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी ना. हंसराज अहीर यांनी प्रयत्न केले होते. मागील काही वर्षांपासून काजीपेठ-बल्लारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांबरोबरच रेल्वे सुविधा संघटना, संघर्ष समिती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सातत्याने केली होती. त्यामुळे ना. हसराज अहीर यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन काजीपेठ-बल्लारशाह-पुणे रेल्वेसेवेचे महत्त्व पटवून दिले. शिवाय, रेल्वे प्रवाशांना दिवाळीची भेट द्यावी अशी मागणी केली. या मागणीबरोबर ना. अहीर यांनी लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध समस्यांबाबत रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या दालनात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेत अहवाल व आवश्यक कागदपत्रांची फाईल सादर करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयीन अधिकाºयांना चर्चेदरम्यान दिले आहे.दरम्यान, काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही रेल्वेगाडी सुरू करण्यास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी होकार दर्शविला. ही गाडी सुरू झाल्यास आंध्र प्रदेश आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या चर्चेत श्रद्धासेतू एक्स्प्रेस (फैजाबाद ते रामेश्वरम) ला चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय तसेच अन्य एक्स्प्रेसबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. तसेच व्यापार आणि उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहराशी दिवसेंदिवस संबंध वाढत आहे. मात्र, पुण्यात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्याने संकटांचा सामना करावा लागत होता. रेल्वेमंत्र्यांनी काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही गाडी सुरू होण्यास होकार दर्शविल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.