शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार

By admin | Updated: March 23, 2015 01:13 IST

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत.

भद्रावती : चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत. या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश चुधरी यांना भ्रमणध्वनीवरून दिले.प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकापेक्षा अनेकांना नोकरीत सामावून घेण्यात आले असून, काहींना नोकरी देण्यासाठी कायद्यावर बोट ठेवून औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, पूर्नवसन अधिकारी हे अडवणूक करीत असल्याचा आरोप सरपंच प्रकाश चुधरी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राकरिता ५२ गावांच्या शेतजमीनी संपादीत करण्यात आल्या. यातील काही प्रकल्पग्रस्तांना शेती, घरे, वऱ्हांडा, झोपडी, गुरांचा गोठा यावरती नोकरीत सामावून घेण्यात आले. परंतु हाच निकष उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना लागू करण्यासाठी अधिकारी असमर्थता दर्शवित आहेत. एकाच कुटुंबातील अनेकांना तसेच प्रकल्पग्रस्तांशी नातेसंबंध जुळत नसलेल्या इतरांना नामनिर्देशनसाठी दिलेल्या पत्रावर या अधिकाऱ्यांनी नोकरीत सामावून घेतले आहे. वास्तविक पाहता नियमानुसार प्रकल्पग्रस्तांचे रक्तातील नाते संबंधितांनाच नोकरीचा अधिकार प्राप्त होतो. सरपंच चुधरी यांनी ही बाब वेळोवेळी पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अधिकाऱ्यांनी व्यवस्थीत उत्तर न देता डावलण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने चुधरी हे गेल्या तीन ते चार वर्षापासून संघर्ष करीत आहे. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षदा दिले. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संभाषण केले व ही बाब त्यांना सांगितली. (शहर प्रतिनिधी)