शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

लालपरीचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे परिवहन महामंडळाला ग्रहण : जून महिन्यात ८.५० कोटींचा घाटा

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. आजघडीला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे.परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात जवळपास २५० बस नियमितपणे धावतात. चंद्रपूर विभागात येणाºया चार आगारांच्या माध्यमातून लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे काम लालपरी करते. २५० बसेसच्या जवळपास एक हजार फेºया दररोज एसटीच्या होतात. यातून पूर्वी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत होते.मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून आजपर्यंत हे लॉकडाऊन व कोरोना संसर्ग अविरत सुरूच आहे. लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच तब्बल तीन महिने एसटी जागेवरच थांबली.परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे. जून महिन्यात एरवी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत असताना यावेळी मात्र महिन्याकाठी केवळ ४५ लाखापर्यंतच उत्पन्न मिळू शकले. त्यामुळे जिल्ह्यात महामंडळाला जून महिन्यात ८.५० कोटींचे नुकसान सहन करावे लागले.२५० पैकी ६० बसेस रस्त्यावरचंद्रपूर जिल्ह्यात महामंडळाच्या जवळपास २५० बस असून त्यापैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. एरवी चंद्रपूर जिल्ह्यातील बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व सेवा विस्कळीत झाली आहे. केवळ जिल्ह्यांतर्गतच बसफेऱ्या सुरू आहेत. या ६० बसेसच्या माध्यमातून दररोज केवळ ३०८ फेऱ्या होत आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातराज्यात लॉकडाऊनपासून बंद असलेली लालपरी २२ मेपासून जिल्ह्य अंतर्गत सुरू झाली. यामधे शासनाने अनेक निर्बंध घालून बस सुरू केली. त्यात ५० टक्के प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. मर्यादित बसफेऱ्या असल्याने दररोज ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच पाचारण करण्यात येत आहे. एसटी तोट्यात चालत असल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे ५० टक्के पगार देण्यात आले तर जून महिन्याचे तर वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात २५० बसेसपैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून बससेवा दिली जात आहे. ५० टक्केच प्रवाशी बसविले जात असल्याने महिन्याकाठी महामंडळाला साडेआठ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,एसटी महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी