शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

By admin | Updated: June 10, 2014 23:58 IST

पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार

चंद्रपूर : पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी काढले. पंजाबी सेवा समितीच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ग्रामीण पत्रकारांच्या मेळाव्यात उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, संपादक संघाचे विदर्भस्तरीय अध्यक्ष डी.के. आरीकर, संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार होते. याप्रसंगी पत्रकार अमर बुद्धारपवार यांना स्मृतिशेष बाळकृष्ण पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकारिता ही चौथी शक्ती असून पत्रकारांमुळेच राज्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभते. शासन, प्रशासनावर वचक निर्माण होतो, असेही ते म्हणाले. आमदार श्यामकुळे यांनी पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणावा, बातमीची खातरजमा करूनच त्या प्रकाशित व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रवीण बडकेलवार, डी.के. आरीकर यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचे विदारक सत्य मांडले. ६० वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पेंशन योजना सुरू करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकारांचा मतदार संघ निर्माण करून विधानसभेत पत्रकारांना प्रतिनिधीत्व प्राप्त करून द्यावे, अशी मागणी केली.दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना याप्रसंगी आदरांजली अर्पण करण्यात आली. किरण बुटले यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक महासचिव राजेश सोलापन यांनी केले. सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या मेळाव्याला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुरेश तावाडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)