शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

By admin | Updated: June 10, 2014 23:58 IST

पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार

चंद्रपूर : पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी काढले. पंजाबी सेवा समितीच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ग्रामीण पत्रकारांच्या मेळाव्यात उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, संपादक संघाचे विदर्भस्तरीय अध्यक्ष डी.के. आरीकर, संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार होते. याप्रसंगी पत्रकार अमर बुद्धारपवार यांना स्मृतिशेष बाळकृष्ण पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकारिता ही चौथी शक्ती असून पत्रकारांमुळेच राज्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभते. शासन, प्रशासनावर वचक निर्माण होतो, असेही ते म्हणाले. आमदार श्यामकुळे यांनी पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणावा, बातमीची खातरजमा करूनच त्या प्रकाशित व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रवीण बडकेलवार, डी.के. आरीकर यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचे विदारक सत्य मांडले. ६० वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पेंशन योजना सुरू करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकारांचा मतदार संघ निर्माण करून विधानसभेत पत्रकारांना प्रतिनिधीत्व प्राप्त करून द्यावे, अशी मागणी केली.दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना याप्रसंगी आदरांजली अर्पण करण्यात आली. किरण बुटले यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक महासचिव राजेश सोलापन यांनी केले. सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या मेळाव्याला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुरेश तावाडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)