शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

जिवती तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाच्या आदेशाला खो !

By admin | Updated: May 3, 2015 01:38 IST

गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभागाबरोबरच विकासात्मक कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसीकता राहणे गरजेचे आहे.

जिवती : गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभागाबरोबरच विकासात्मक कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसीकता राहणे गरजेचे आहे. तेव्हाच गाव-खेड्याच्या विकासाला हातभार लागेल. प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश असले तरी या नियमाला फाटा देत नियमीत कार्यालयात न येणे, पूर्ण वेळ सेवा देण्यासाठी टाळाटाळ करणे, त्यामुळे ग्रामीण जनता विकासापासून वंचित आहेत. रहिवासी दाखला, जातीचा दाखला व इतर महत्त्वाच्या दाखल्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊन प्रवासामुळे विकास कामांना ब्रेक लागला असून महत्त्वाची कामेही रेंगाळली आहेत.ग्राम विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी ग्रामपंचायत ही शासनाची संस्था असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे हे एक माध्यम आहे. मात्र त्या ग्रामपंचातीचे ग्रामसेवकच मुख्यालयी राहत नसल्याने शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचत नसल्याची ओरड तालुक्यात सुरू आहे. गावातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी आदी समस्यांनी डोके वर काढले आहे. सध्या अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार हेच प्रश्न घेऊन जनता ओरडत असली तरी त्यांना न्याय देणारा कुणीच वाली नाही, हे वास्तव आहे. जिवती तालुका अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून सर्वत्र ओळख असली तरी त्या मागास क्षेत्राला विकासाकडे वळविण्याचे प्रयत्न कोणी केले नाही. ज्यांना निवडून दिले ते कधी गावाकडे फिरकले नाही, अशी गावकऱ्यांची ओरड आहे. गाव विकासात्मक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, शिक्षक, ग्रामसेवक, कृषीसेवक, पटवारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम विभाग पंचायत व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवित अप-डाऊन करीत आहेत. त्यामुळे शासनस्तरावरुन राबविल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा नागरिकांना होत नाही. गरजू लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत नसल्याने आजही पहाडावरील अनेक कुटुंब पडक्या घरात आपले जीवन जगत आहे.दारिद्र्याचे प्रमाण तालुक्यात जास्त असून शासनाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आजही हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन मुख्यालयाला खो देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)