शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

जिवती तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाच्या आदेशाला खो !

By admin | Updated: May 3, 2015 01:38 IST

गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभागाबरोबरच विकासात्मक कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसीकता राहणे गरजेचे आहे.

जिवती : गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभागाबरोबरच विकासात्मक कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसीकता राहणे गरजेचे आहे. तेव्हाच गाव-खेड्याच्या विकासाला हातभार लागेल. प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश असले तरी या नियमाला फाटा देत नियमीत कार्यालयात न येणे, पूर्ण वेळ सेवा देण्यासाठी टाळाटाळ करणे, त्यामुळे ग्रामीण जनता विकासापासून वंचित आहेत. रहिवासी दाखला, जातीचा दाखला व इतर महत्त्वाच्या दाखल्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊन प्रवासामुळे विकास कामांना ब्रेक लागला असून महत्त्वाची कामेही रेंगाळली आहेत.ग्राम विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी ग्रामपंचायत ही शासनाची संस्था असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे हे एक माध्यम आहे. मात्र त्या ग्रामपंचातीचे ग्रामसेवकच मुख्यालयी राहत नसल्याने शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचत नसल्याची ओरड तालुक्यात सुरू आहे. गावातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी आदी समस्यांनी डोके वर काढले आहे. सध्या अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार हेच प्रश्न घेऊन जनता ओरडत असली तरी त्यांना न्याय देणारा कुणीच वाली नाही, हे वास्तव आहे. जिवती तालुका अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून सर्वत्र ओळख असली तरी त्या मागास क्षेत्राला विकासाकडे वळविण्याचे प्रयत्न कोणी केले नाही. ज्यांना निवडून दिले ते कधी गावाकडे फिरकले नाही, अशी गावकऱ्यांची ओरड आहे. गाव विकासात्मक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, शिक्षक, ग्रामसेवक, कृषीसेवक, पटवारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम विभाग पंचायत व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवित अप-डाऊन करीत आहेत. त्यामुळे शासनस्तरावरुन राबविल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा नागरिकांना होत नाही. गरजू लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत नसल्याने आजही पहाडावरील अनेक कुटुंब पडक्या घरात आपले जीवन जगत आहे.दारिद्र्याचे प्रमाण तालुक्यात जास्त असून शासनाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आजही हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन मुख्यालयाला खो देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)